VIDEO | कोरोनाकाळात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी, लवकर शासन निर्णय येणार

| Updated on: Dec 08, 2021 | 10:29 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचार संहिता अंमलात असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय 10 डिसेंबर, 2021 ते 15 डिसेंबर, 2021 दरम्यान काढण्यात येईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परिक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, असे भरणे म्हणाले.

VIDEO | कोरोनाकाळात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी, लवकर शासन निर्णय येणार
MPSC च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून MPSC आणि सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया होवू शकल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा देता आल्या नाहीत. यामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न ऐरणीवर होता. मात्र आता वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकार एक वाढीव संधी देण्याच्या विचार करीत आहे. लवकरत राज्य शासन याबाबत निर्णय घेईल आणि सदर बाबीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास देण्यात येतील.

काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

सदर नोकर भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांचे हित लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना MPSC परिक्षेकरीता एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचार संहिता अंमलात असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय 10 डिसेंबर, 2021 ते 15 डिसेंबर, 2021 दरम्यान काढण्यात येईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परिक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, असे भरणे म्हणाले.

खासदार संभाजीराजेंनीही मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या. विविध संवर्गातील जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. यामध्ये काही विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा संपली. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत खासदार संभाजीराजेंनी मध्यस्थी करुन विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कळवली होती. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खासदार संभाजीराजेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दोन वाढीव संधी द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. (An increased opportunity for MPSC exams for candidates who have crossed the age limit in Corona period)