Hostel For All Communities : सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

| Updated on: Apr 24, 2022 | 5:30 PM

आज उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत अन्य मान्यवरांसह उपस्थित होते.

Hostel For All Communities : सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पालकमंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार (मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळा )
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

नाशिक : मुंबईत (Mumbai) वांद्रामधील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठं वसतिगृह (Hostel) उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केलीये. आज उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत अन्य मान्यवरांसह उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,

  • सुरुवातीच्या काळात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वसतिगृहे निर्माण केली व शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात आणून त्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करणे, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी पाठविण्यासाठी मदत करणे हा विचार त्याकाळात शाहू महाराजांनी केला. शाहू महाराजांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोलाचे आहे.
  • आजच्या काळात शिक्षणाचे चित्र बदलले असून शिक्षणाची साधनेसुद्धा अधिक प्रगत झाली आहेत. आपल्या संविधानाने आपल्याला सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली आहे. देशात वेगवेगळ्या जाती, धर्म व पंथ जरी असले तरी सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण आपणास शिवाजी महाराजांनी दिली व त्याच मार्गाने फुले, शाहू व आंबेडकर यांनी सर्वांना पुढे नेले व आजही सर्वांना त्याशिवाय तरणोपाय नाही,
  • आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे. उच्च शिक्षणाची कास धरून आपले भवितव्य, पालकांचे व देशांचे नाव उज्ज्वल करावे. आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेवून एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी.

शिकून देशाचे नाव उज्ज्वल करा – छगन भुजबळ

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आज मातोश्री मुलीच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून, या वसतिगृहात महाज्योती, सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थींनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. व एकत्रित शिक्षणाने सर्वांमध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे.
लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे. सर्व मुला-मुलींनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील राहून, डॉक्टर, इंजिनियर्स, आय. टी. क्षेत्रात प्राविण्य मिळविले पाहिजे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिकून देशाचे नाव उज्वल करा असा संदेश यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार – उदय सामंत

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी 2 वसतिगृहे सुरू करणार आहेत. भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत. मातोश्री मुलींच्या वसतिगृहात 200 विद्यार्थी क्षमता असून यात 75 विद्यार्थी सारथी संस्थेकडून, 75 विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून, 50 विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज, एच पी टी कॉलेज,के.टी.एच. कॉलेज, स्कॉऊट, एन.सी.सी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.

इतर बातम्या :

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर बसला भीषण आग; बस जळून खाक

राणा दांपत्यांविरोधात राजद्रोहाचे कलम लागले; तुम्हाला माहितीय का राजद्रोह लागला तर ‘जन्मठेपही’ होऊ शकते

Cm Uddhav Thackeray : झुकेंगे नहीं म्हणणाऱ्या फायरब्रँड आजीला मुख्यमंत्री भेटणार, सोशल मीडियावरही जोरदार हवा