IIT : देशातील जातीवादाची दरी होणार दूर; आयआयटी बॉम्बेकडून खास कोर्स तयार

| Updated on: Jul 05, 2022 | 8:18 PM

लोकांमध्ये निर्माण झालेली जातीवादाची दरी दूर करण्यासाठी आता जातिव्यवस्था (Caste system) शिकवली जाणार आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) यासंदर्भात एक कोर्स सुरू करणार आहे.

IIT : देशातील जातीवादाची दरी होणार दूर; आयआयटी बॉम्बेकडून खास कोर्स तयार
IIT-Bombay
Image Credit source: tv9
Follow us on

लोकांच्या मनात असलेली जातीवादाची दरी दूर करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी बॉम्बे (IIT) यासंदर्भात एक कोर्स सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागचा हेतू जातीबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. हा एक अनिवार्य अभ्यासक्रम असेल. एससी/एसटी सेलने घेतलेला हा पहिलाच पुढाकार आहे. असे केल्याने जातिभेद संपुष्टात येण्यास मदत होईल, असा विश्वास सेलला आहे. सर्वेक्षण आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम (Academic curriculum) या अभ्यासक्रमाबाबत आयआयटी बॉम्बेने म्हटले आहे, की सेलकडून नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. जातीविभागणीमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते हे समजून घेणे हा त्यामागचा उद्देश होता. यासोबतच जातीय आणि वांशिक भेदभावावर एक शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करण्यावर या सर्वेक्षणात (Survey) भर देण्यात आला आहे.

लिंग संवेदीकरण अभ्यासक्रमाच्या धर्तीवर सुरू करा

जातीवादाची पाळेमुळे सामान्य माणसापासून तर उच्च वर्गीयांत देखील खोलवर रुजली आहे. जात धर्म, रंग यावरून अजून देखील भेदभाव बघायला मिळत आहे. यासाठी देशभरात नेहमीच जातीवादाचा निषेध होत आला आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली ही दरी दूर करण्यासाठी आता जातिव्यवस्था (Caste system) शिकवली जाणार आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) यासंदर्भात एक कोर्स सुरू करणार आहे.  गेल्या वर्षी सुरू झालेल्या अनिवार्य लैंगिक संवेदना अभ्यासक्रमाच्या धर्तीवर हा जात जागृती अभ्यासक्रम तयार करण्यास सांगितले आहे. SAILमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक भरत अडसूळ आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मधु एन बेलूर हे संयोजक आणि सह-संयोजक आहेत.

हे सुद्धा वाचा

जातीवर आधारित टिप्पण्या दूर करण्यात मदत होईल

या अभ्यासक्रमाबाबत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सेलचे म्हणणे आहे की, यामुळे जातिभेदाशी संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होईल. यासोबतच जातीवर आधारित टिप्पण्यांवरही बंदी घालण्यात येईल आणि वातावरणात एकोपा निर्माण होईल. सेलने पहिल्यांदाच जातीच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यामागची कारणे यावर खुली चर्चा आयोजित केली होती. यावेळी सभेत सुमारे 100 उपस्थितांनी आपली मते मांडली. ज्यामध्ये जागांच्या आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना टोमणे मारावे लागत असल्याचे समोर आले. आयआयटीच्या प्राध्यापकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या जातींवरील नवीन अभ्यासक्रमामुळे जातींबद्दल चुकीची विचारसरणी असलेल्या लोकांमध्ये जागृती निर्माण होईल, ज्यामुळे समाजात चांगले वातावरण निर्माण होईल.