AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपुल्याच घरात हाल सोसते मराठी…; दहावीत किती विद्यार्थी मराठीत नापास? आकडा वाचून धक्काच बसेल

राज्यात दहावीच्या निकालात मराठी विषयाची स्थिती चिंताजनक असून ९४,५४४ विद्यार्थी नापास झाले आहेत. प्रथम भाषा मराठीत ८० हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने भाषेच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आपुल्याच घरात हाल सोसते मराठी...; दहावीत किती विद्यार्थी मराठीत नापास? आकडा वाचून धक्काच बसेल
marathi
| Updated on: May 09, 2026 | 9:52 AM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. महाराष्ट्रातील एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा निकाल समाधानकारक लागला असला तरी मराठी विषयाच्या निकालाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यात मराठी भाषा बारावीपर्यंत सक्तीची करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊनही प्रत्यक्ष निकालात मात्र मराठीची पीछेहाट सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.

किती विद्यार्थी नापास?

यंदा दहावीचा मराठी विषयाचा निकाल ९२ टक्के इतका लागला आहे. याचाच अर्थ, परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ टक्के विद्यार्थी आपल्या मातृभाषेतच पास झालेले नाहीत. तसेच यातील काही विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नापास झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० हजार ८०३ विद्यार्थ्यांना प्रथम भाषा (First Language) म्हणून मराठी विषय घेतलेले आहेत. साधारण मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची ही अवस्था मराठी भाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

घसरणीची प्रमुख कारणे

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मराठी विषयातील या घसरणीला अनेक घटक कारणीभूत आहेत. आजकाल कॉन्व्हेंट संस्कृती वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा, तसेच त्यांच्या पालकांचा कल इंग्रजीकडे वाढला आहे. यामुळे मराठीचा वापर घरात आणि बाहेर बोलण्यापुरता मर्यादित राहिला आहे. व्याकरणाच्या नियमांचे अज्ञान, ऱ्हस्व-दीर्घ चुका आणि शुद्धलेखनाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणावर कापले जात आहेत. तसेच, तंत्रज्ञानाच्या युगात अवांतर वाचनाची सवय सुटल्याने विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह कमालीचा घटला आहे.

दरम्यान या निकालानंतर आता शाळांमध्ये मराठी शिकवण्याच्या पद्धतीतही काळानुसार बदल होणे आवश्यक आहे. केवळ पाठांतर आणि उत्तरपत्रिका भरण्यावर भर न देता, भाषेचे उपयोजन आणि गोडी निर्माण करण्यावर शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मराठी विषयाची ही दयनीय स्थिती सुधारण्यासाठी केवळ सक्तीचे कायदे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल प्रेम निर्माण होणे ही काळाची गरज बनली आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं