महानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक, 500 मजुरांना पाठवणार

अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी तीन विमानं बुक केली आहेत (Amitabh Bachchan help migrant workers).

महानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक, 500 मजुरांना पाठवणार
फोटो सौजन्य : फेसबुक
Follow us
| Updated on: Jun 10, 2020 | 8:08 PM

मुंबई : अभिनेता सोनू सूद पाठोपाठ आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी (Amitabh Bachchan help migrant workers) पुढे सरसावले आहेत. अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी तीन विमानं बुक केली आहेत. यापैकी पहिलं विमान आज (10 जून) सकाळी 6 वाजेच्या सुमारास 180 मजुरांना घेऊन वाराणसीच्या दिशेला रवाना झालं. दुसरे दोन विमानंदेखील आजच रवाना होणार आहेत. मात्र, त्याबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या निदर्शनाखाली मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्याचं नियोजन सुरु आहे. याबाबच ‘मिडे डे’ वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे (Amitabh Bachchan help migrant workers) .

“सर्व नियोजन अत्यंत सावधगिरीने केलं जात आहे. कारण अमिताभ बच्चन यांना पब्लिसिटी नकोय. स्थलांतरित मजुरांची दुर्दशा पाहून अमिताभ बच्चन स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्थलांतरित मजुरांना घरी जाण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला”, असं सुत्रांनी सांगितलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी वाराणसीला जाणारं इंडिगो फ्लाइट भाड्याने घेतलं. या फ्लाइटने 180 प्रवाशांना वाराणसीत पाठवण्यात आलं. या मजुरांना सुरुवातीला ट्रेनने पाठवण्याचा विचार होता. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू आणि इतर राज्यांच्या स्थलांतरित मजुरांची देखील व्यवस्था करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अमिताभ बच्चन यांनी याअगोदर 29 मे रोजी उत्तर प्रदेशच्या स्थलांतरित मजुरांची बसने घरी जाण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी माहिम दर्गा ट्रस्ट आणि हाजी अली दर्गा ट्रस्ट सोबत 10 बसमधून 250 मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली होती. या दहा बसमध्ये मजुरांच्या जेवणाची आणि मेडिकल किटबाबतच्या सर्व सुविधा होत्या.

अमिताभ बच्चन यांचं गेल्या दोन महिन्यांपासून गरिबांना मदत करण्याचं काम सुरु आहे. ते विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मुंबईच्या विविध भागातील सर्वसामान्य गरिब कुटुंबांना खाद्य पदार्थांचे पॅकेट्स वाटत आहेत. बच्चन यांच्या कंपनीने आतापर्यंत 1000 कुटुंबांना रेशन पॅकेट्स दिले आहेत. हे रेशन पॅकेट प्रत्येक कुटुंबाला एक महिनाभर पुरतं. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्याकडून आतापर्यंत 2000 रेशन पॅकेट्स, 2000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, 1200 चपलांचे जोडे स्थलांतरित मजुरांना वाटण्यात आलं आहे.

हेही वाचा :

Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार

मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.