
‘छावा’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा मिळाला आहे. छत्रपती संभाजी राजे यांचं जीवन चरित्र, त्यांचा पराक्रम आणि त्यांचं बलिदान पुन्हा एकदा लोकांसमोर आलं आहे. या सिनेमाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. छावा सिनेमात संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणाऱ्या विक्की कौशलच्या अभिनयाचंही कौतुक केलं जात आहे. तर औरंगजेबची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचंही प्रेक्षक कौतुक करत आहे. अक्षय खन्नाने खुंखार औरंगजेब जसाच्या तसा उभा केला आहे. त्यामुळेच छावा सोबत औरंगजेबही इंटरनेटवर चांगलाचा ट्रेंड करत आहे. औरंगजेबाला अखेरपर्यंत मराठ्यांना जिंकता आलं नव्हतं. त्याचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला. पण त्याला मराठ्यांना हरवता आलं नाही. मरताना औरंगजेबाची परिस्थिती कशी होती? त्याचे अखेरचे शब्द काय होते? (Aurangzeb’s last words)याचाच घेतलेला हा आढावा. जगभरात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा डंका वाजत आहे. छावाने तर बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली आहे. मुघलांनी...