महेश मांजरेकरांनी अवघ्या 20 मिनिटांत लिहिली स्क्रिप्ट अन् संजूबाबाने 15 मिनिटात दिला होकार, वाचा ‘वास्तव’चा किस्सा

| Updated on: Oct 08, 2021 | 7:57 AM

महेश मांजरेकर यांनी संजय दत्तसोबत 'वास्तव' हा पहिला हिंदी चित्रपट बनवला ज्याची कथा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाने संजय दत्तला एकल नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नवसंजीवनी दिली.

महेश मांजरेकरांनी अवघ्या 20 मिनिटांत लिहिली स्क्रिप्ट अन् संजूबाबाने 15 मिनिटात दिला होकार, वाचा ‘वास्तव’चा किस्सा
Sanjay Dutt
Follow us on

मुंबई : अभिनेता संजय दत्तची तिसरी इनिंग आतापर्यंत थक्क करणारी आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो ‘भूमी’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतला. पण, इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की संजय दत्तने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले नाही, जे एकेकाळी त्याचे जवळचे मित्र होते. परिणामी संजय दत्तचा हा चित्रपट केवळ फ्लॉप ठरला नाही, तर या नंतरचे त्याचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले.

त्याच्या तिसऱ्या इनिंगमधील सलग फ्लॉपची संख्या आठवर गेली आहे. त्याचे चार चित्रपट आता रांगेत रिलीजला आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की याआधीही संजय दत्तने सोलो हिरो म्हणून सलग फ्लॉप चित्रपट देण्याचा आणखी मोठा विक्रम केला आहे. हिंदी चित्रपटाने संजय दत्तला जवळजवळ नाहीसेच केले होते, जर मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिभावान दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यावेळेस पुढे आले नसते तर ते शक्यही झाले असते.

‘वास्तव’ने दिली नवसंजीवनी

महेश मांजरेकर यांनी संजय दत्तसोबत ‘वास्तव’ हा पहिला हिंदी चित्रपट बनवला ज्याची कथा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाने संजय दत्तला एकल नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नवसंजीवनी दिली.

‘वास्तव’ मधून आपल्या करिअरला जीवनदान देणाऱ्या संजय दत्तच्या मते,  त्याने सर्व चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतली आहे. पण ‘वास्तव’ चित्रपटाने त्याला खरंच शिकवलं की अभिनय म्हणजे काय आणि अभिनेता होणं म्हणजे काय आहे. ‘वास्तव’ हा चित्रपट संजय दत्तच्या हृदयाच्या अगदी जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटाने त्याला त्याच्या कारकिर्दीतील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला होता.

अशी तयार झाली कथा

1995 साली, जेव्हा संपूर्ण देश शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटासाठी वेडा झाला होता, तेव्हा ‘आई’ या मराठी चित्रपटाने देश आणि जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘निदान’ मिळवण्यात या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा फायदा झाला. त्यावेळी त्यांची भेट संजय दत्तशी झाली. एक दिवस जेव्हा संजय दत्त एका चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा त्याला महेश मांजरेकरांनी त्याला एका कथेबद्दल सांगितलेले आठवले. महेशला सेटवर भेटण्यासाठी आणि त्याची स्क्रिप्ट सांगण्यासाठी संजय दत्तने कॉल केला. महेश मांजरेकर काय उत्तर देणार? त्यावेळी स्क्रिप्ट तयारच नव्हती. अशावेळी ते तणावात आले. एका हॉटेलमध्ये बसून त्यांनी वेटरकडून पेन घेऊन कागदावर लिहायला सुरुवात केली. एकदा त्यांनी लिहायला सुरुवात केली, मालिका अशा प्रकारे बनवली गेली की, तिथे बसून महेश यांनी त्या चित्रपटाच्या 20 दृश्यांची स्क्रिप्ट लिहिली. हा पेपर घेऊन महेश मांजरेकर संजय दत्तला भेटायला पोहोचले. संजय दत्तने 20 मिनिटात लिहिलेली स्क्रिप्ट फक्त 15 मिनिटांसाठी ऐकली आणि त्याने ठरवले की, त्याला हा चित्रपट करायचा आहे. पुढे ‘वास्तव’ने जो इतिहास घडवला तो संपूर्ण देशाने पहिला.

हेही वाचा :

‘माफिया पप्पू आर्यनच्या बचावासाठी पुढे येतायत…’, हृतिक रोशनच्या पोस्टनंतर कंगना रनौत संतापली!

KBC 13 | …जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन 30 जुन्या अंगरक्षकाला भेटतात अन् त्याची अधुरी इच्छा पूर्ण करतात!