Javed Akhtar: मुस्लीम देशातील लोक म्हणजे कचरा…, ‘त्या’ निकृष्ट दर्जाच्या निर्णयावर भडकले जावेद अख्तर

Javed Akhtar: मुस्लीम देशातील निकृष्ट दर्जाचे नियम आणि कायदे... मुस्लीम देशात लोकांना कचरा म्हणत जावेद अख्तरांकडून संताप व्यक्त म्हणाले, 'आता मुफ्ती - मौलाना गप्प का...?', एक्सवर त्यांनी व्यक्त केला संताप...

Javed Akhtar: मुस्लीम देशातील लोक म्हणजे कचरा..., त्या निकृष्ट दर्जाच्या निर्णयावर भडकले जावेद अख्तर
Javed Akhtar
| Updated on: Feb 22, 2026 | 9:46 AM

Javed Akhtar: अफगानिस्तान या मुस्लीम देशात तालिबान शासनाने नवीन पीनल कोड लागू केला आहे. ज्यामध्ये पत्नीला मारहाण करणं कायद्याच्या विरोधात नाही… अफगानिस्तान येथील नवीन कायद्याने महिलांना जवळपास गुलाम घोषित केलं आहे. यावर संगीतकार जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे. तालिबानच्या या नव्या आणि निकृष्ट दर्जाच्या कायद्यानुसार, पत्नीला मारहाण करण्यास सूट दिली आहे. तर फक्त मारहान करताना हाड तुटलं नाही पाहिजे आणि कोणती जखम समोर दिसली पाहिजे… असं सांगण्यात आलं आहे. जावेद अख्तर यांनी या भयानक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत केवळ तालिबानवर टीका केली नाही तर भारतातील धार्मिक नेत्यांना धर्माच्या नावाखाली होणाऱ्या या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केलं आहे.

जावेद अख्तरांकडून संताप व्यक्त…

सोशल मीडिया प्लेटफॉर्म X (ट्विटर) वर तालिबानच्या नव्या निर्णयांना त्रासदायक सांगितलं आहे. एक्सवर जावेद अख्तर लिहितात, ‘तालिबानने पत्नीला मारहाण करण्यास सूट दिला आहे. अट फक्त एकच की हाड तुटलं नाही पाहिजे…’, जावेद अख्तर पुढे म्हणतात, ‘जर कोणती महिला पतीच्या परवानगी शिवाय माहेरी जात असेल तर, तिला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल….’, संताप व्यक्त करत जावेद अख्तर यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘मुफ्ती आणि मौलाना यावर गप्प का आहेत?’

 

 

दुसऱ्या पोस्टमध्ये जावेद अख्तर म्हणतात, ‘राजकीय फायदा काहीही असो, आपण या कृतघ्न, क्रूर तालिबान्यांना कोणताही विश्वास किंवा आदर देऊ नये. ते जगाची घाण आहेत.’, सध्या जावेद अख्तर यांची पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.

 

 

तालिबानचा नवीन कायदा काय म्हणतो?

तालिबानने त्यांचा नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याने स्वाक्षरी केलेला 90 पानांचा नवीन दंड संहिता लागू केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये महिलांना गुलामाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय, नवरा बायकोला मारु शकतो. बायकोला गंभीर मार लागल्यास ती तक्रार करु शकते. पण त्याचे पुरावे महिलेला न्यायलयात द्यावे लागतील. न्याय मागायला जाताना देखील महिलेला, तिच्या आई – वडिलांसोबत किंवा पतीसोबत जावं लागेल. शिवाय शरीरावर झालेल्या जखमा दाखवाव्या लागतील…