RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

| Updated on: Dec 17, 2021 | 1:10 AM

दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील 'अल्लुरी सीताराम राजू' आणि 'कोमाराम भीम' या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. 'अल्लुरी सीताराम राजू' आणि 'कोमाराम भीम' ही नावे भारतीय इतिहासात दिसत नसली, तरी त्यांच्याबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या
ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते 'अल्लुरी सीताराम राजू' आणि 'कोमाराम भीम कोण होते?
Follow us on

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR (Rise Roar Revolt) 7 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे. राजामौली यांनी केवळ चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवरच नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण (अल्लुरी सीताराम राजू) आणि ज्युनियर एनटीआर (कोमाराम भीम) यांच्या मार्फत भारताचा प्रेरणादायी सुवर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपला भूतकाळ नेहमीच ऐतिहासिक आणि गौरवशाली राहिला आहे, हेही राजामौली यांनी या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात साऊथ सिनेसृष्टीतील दोन मोठे स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात राम चरण यांनी स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे. तर, साऊथचा अॅक्शन स्टार ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भटने सीतेची भूमिका साकारली आहे, तर अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ ही नावे भारतीय इतिहासात दिसत नसली, तरी त्यांच्याबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ब्रिटिश काळातील या दोन नायकांच्या शौर्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक राजामौली यांनी 5 वर्षांपूर्वी RRR हा तमिळ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

‘अल्लुरी सीताराम राजू’ कोण होते?

अल्लुरी सीताराम राजू यांनी देशासाठी जे केले ते कोणीही विसरू शकत नाही. अल्लुरी यांचा जन्म 1857 मध्ये विशाखापट्टणम येथे झाला. वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी संसारिक जीवनातून संन्यास घेतला. यादरम्यान त्यांनी देशातील अनेक शहरे, मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश असा प्रवास केला. अल्लुरी सीताराम राजू यांच्यावरही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता.

1920 च्या सुमारास अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत देश इंग्रजांच्या अत्याचाराचा साक्षीदार झाला होता. अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला. यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेचे विचार सोडून त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले आणि आपले धनुष्य-बाण घेऊन इंग्रजांचा नायनाट करण्यासाठी निघाले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना अल्लुरी सीताराम राजू यांनीही इंग्रजांकडून अनेक छळ सोसले होते. असे असूनही इंग्रजांच्या जाचक धोरणांसमोर त्यांनी कधीही मान झुकवली नाही. 1924 मध्ये ब्रिटीश सैनिकांनी क्रांतिकारक अल्लुरी यांना झाडाला बांधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला. अल्लुरी सीताराम राजू आज आपल्यात नसले तरी त्यांच्या बलिदानात खूप काही आहे ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो.

कोमाराम भीम कोण होते?

कोमाराम भीम यांचा जन्म 1901 मध्ये संकेपल्ली, हैदराबाद येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम भीमांच्या जीवनात एकच उद्देश होता, तो म्हणजे गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणे. भीम फक्त 19 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. वडिलांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या भीमाला ‘निजामाच्या राजवटीला धडा शिकवायचा होता, पण निजामाच्या राजवटीशी एकटा लढण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. तरुणपणात भीम यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा खूप प्रभाव होता. त्याच्याप्रमाणेच त्याला देशासाठी काहीतरी करायचे होते.

दरम्यान, कोमाराम भीम यांना भगतसिंग यांच्या फाशीची बातमी मिळाली, त्यामुळे ते खूप दुःखी झाले. यानंतर भीमाने इंग्रजांच्या पाठीराख्या निजामांना हैदराबादमधून हाकलून देण्याची योजना आखली आणि निजामाच्या राजवटीविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले. या दरम्यान भीमाने हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी ‘असफ जही घराण्या’ विरुद्ध बंड केले. ‘निजामाच्या राजवटीने’ कोमाराम भीमाला पकडण्यासाठी 300 सैनिकांची फौज पाठवली, पण भीमाने आपल्या शौर्याने निजाम सैनिकांचा नायनाट केला.

यादरम्यान भीमाने निजामाच्या न्यायालयीन आदेश, कायदे आणि त्याच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान दिले. 1928 ते 1940 या काळात त्यांनी हैदराबादच्या निजाम सरकारच्या विरोधात ‘गनिमी मोहीम’ सुरू ठेवली. या काळात भीमाने शौर्याने युद्ध केले आणि जंगलातील प्रत्येक लढाई जिंकली. भीमाच्या शौर्याने निजामाचे सैन्य भयभीत होत होते. या दरम्यान भीमाने आपल्या आयुष्याचा मोठा काळ जंगलात ‘राजवंशा’विरुद्ध लढताना घालवला. अखेर निजाम आणि इंग्रजांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याने 27 ऑक्टोबर 1940 रोजी हे जग सोडले. (Know the who were ‘Alluri Sitaram Raju’ and ‘Komaram Bhim’)

इतर बातम्या

Salman Khan : अभिनेता सलमान खानचं अपार्टमेंट 95 हजार रुपये महिना भाड्याने, स्वत: राहतो एका 1BHK मध्ये!

Miss universe 2021 : भारताच्या अप्सरा एकाच वर्षी दोन किताब जिंकणार? मनसा वाराणसीकडे सर्वांच्या नजरा