
Madhuri Dixit – Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त सध्या ‘धुरंधर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने अस्लम चौधरी ही भूमिका साकारली आहे. सिनेमातील संजूबाबाच्या भूमिकेला सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. आता सिनेमामुळे चर्चेत असलेल्या संजूबाबा याच्या खासगी आयुष्याची देखील चर्चेत आहे. आता संजय दत्त तिसरी बायको आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्याने 20 – 30 नाही तर, तब्बल 308 महिलांना डेट केलं होतं… याचा स्वीकार खुद्द अभिनेत्याने केलेला.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत देखील संजूबाबाच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या. पण तेव्हा अभिनेता विवाहित आणि एका मुलीचा बाप देखील होचा… संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. रिचा हिच्या निधनानंतर अभिनेत्याची मेहुनी एना शर्मा हिने माधुरीवर अनेक गंभीर आरोप केले. ‘Madhuri Dixit मुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला’ असं रिचाच्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितलं.
रिचा शर्मा हिची बहीण एना शर्मा हिने सांगितल्यानुसार, ‘संजय आणि माधुरी एकमेकांचे चांगले मित्र होते. पण आम्ही कधीच त्यांच्या मैत्रीवर बोट ठेवला नाही… पण माधुरीने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला. माधुरी हिच्यामध्ये माणुसकी बिलकूल नाहीये… ती चांगली व्यक्ती नाही… मला असं म्हणायचं आहे की, तिला दुसरा कोणतही चांगला पुरुष भेटला असता… माधुरी अशा पुरुषासोबत कशी राहू शकते, ज्याने स्वतःच्या बायकोसोबत असं वर्तन केलं आहे.’, असं देखील संजय याची मेहुणी म्हणालेली.
पण एका मुलाखतीत संजय याने देखील यावर मोठं वक्तव्य केलं होतं. संजूबाबा म्हणालेला, ‘आमच्यामध्ये असं काही असायला तर हवं होतं, ज्यामुळे मी माधुरी हिच्यासोबत लग्न करु शकू… पहिल्या दिवसापासून ती माझी मैत्रीण होती..’ असं संजूबाबा म्हणालेला. पण अशी देखील चर्चा होती की, संजय याच्यासोबत असलेलं नातं माधुरी हिच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. पण जेव्हा मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्त याचं नाव पुढे आलं, तेव्हा माधुरी दीक्षित हिने संजूबाबाची साथ सोडली. तेव्हा पासून कधीही दोघे एकत्र आले नाही. आता संजय दत्त आणि माधूरी दीक्षित त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.