Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले फडणवीस?
सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत असून आतापर्यंत त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल केले गेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात काहीही माहिती आहे, ती तातडीने शासनाला द्यावी.
सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत असून आतापर्यंत त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल केले गेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात काहीही माहिती आहे, ती तातडीने शासनाला द्यावी. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, तसेच इतरांनाही यामुळे धडा बसावा अशी शिक्षा केली जाईल. फडणवीस यांनी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, महाराष्ट्रात धर्म आणि संस्कार वाढले पाहिजेत, पण भोंदूगिरीला स्थान मिळू नये. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात आहेत; परंतु सेक्शन ३ कार्यरत असल्यामुळे अंमलबजावणीस अडथळा येत नाही. त्यांनी उपरोधिक शैलीत म्हटले की, जर जादूटोण्याने समस्या सुटत असत्या, तर देशाला वेगळ्या उपाययोजनांची गरजच पडली नसती; दहशतवाद्यांवर नियंत्रण, सीमाभेट, निवडणूक विजय या सर्व गोष्टी सहज साधल्या गेल्या असत्या. त्यांच्या या विधानातून प्रकरणाची गंभीरता आणि अंधश्रद्धेविरोधात सरकारच्या भूमिका स्पष्ट झाल्या आहेत.

