Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

| Updated on: Jul 11, 2022 | 9:31 AM

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट दमदार कामगिरी करत सुपरहिट ठरला.

Dharmaveer: धर्मवीर चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
Dharmaveer
Image Credit source: Instagram
Follow us on

धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनपटावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला आहे. दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने नुकतंच या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं. अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक (Prasad Oak), श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे या कलाकारांच्या भूमिका आहेत.

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट दमदार कामगिरी करत सुपरहिट ठरला. त्यानंतर आता दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आल्याने चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

याआधी चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकला दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आला होता. ‘हा सन्मान मी आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खासदार श्रीकांतजी शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार,’ अशी पोस्ट लिहित प्रसादने आभार व्यक्त केला होता.

धर्मवीर आनंद दिघे यांनी निस्वार्थीपणे, कोणताही लोभ न ठेवता केवळ आणि केवळ सामान्यांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघेंची, क्षितीज दातेनं एकनाथ शिंदेंची आणि मकरंद पाध्येनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साकारली. रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी चित्रपटातील या कलाकारांच्या लूकवर मेहनत घेतली.