Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा फिल्म ठरवणाऱ्यांना प्रसिद्ध डायरेक्टर राम गोपाल वर्मांचं रोखठोक उत्तर, मग तुम्ही…

Dhurandhar 2 : "चित्रपटाचा प्रभाव असा आहे की, ही सुपरहिट फिल्म बनली आहे. माझ्या मते धुरंधर 2 ने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. यानंतर ते जुने स्टीरियोटाइप संपू शकतात. हिरो वरती उठतो, मुक्का मारल्यानंतर हवेत उडणं, अशा चित्रपटाचं प्रमाण आता कमी होईल"

Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा फिल्म ठरवणाऱ्यांना प्रसिद्ध डायरेक्टर राम गोपाल वर्मांचं रोखठोक उत्तर, मग तुम्ही...
ram gopal verma praises aditya dhar
Image Credit source: instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 3:39 PM

आदित्य धर धुरंधर चित्रपट घेऊन आल्यापासून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सतत त्याचं चित्रपटाबद्दल बोलतायत. ते आदित्य धरच्या कामावर खूप प्रभावित झाले आहेत. राम गोपाल वर्मा धुरंधरचं कौतुक करताना थकत नाहीय. धुरंधर सिनेमामुळे भारतीय सिनेमात बदल येईल असच ते म्हणत आहेत. राम गोपाल वर्मा फिल्म इंडस्ट्रीमधील असे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी ‘धुरंधर द रिवेंज’चा रिव्यू सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या मते हा चित्रपट शोले पेक्षा अनेक पटीने चांगला आहे. आता चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना हा चित्रपट शानदार वाटलाय. अन्य लोकांनी या फिल्मला प्रोपेगेंडा ठरवलय.

‘धुरंधर द रिवेंज’मध्ये मोदी सरकारच्या नोटबंदीपासून दहशतवाद अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे. त्यामुळे काही जण या चित्रपटाला प्रोपेगेंडा ठरवतायत. सोशल मीडियावर यावरुन वादविवाद सुरु आहेत. आता राम गोपाल वर्मा यांनी धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा चित्रपट ठरवण्यावर रिएक्ट केलय.

तो आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार

न्यूज एजेंसी ANI शी बोलताना राम गोपाल वर्मा म्हणाले की, “प्रोपेगेंडाचा अर्थ मला समजत नाही. प्रत्येक माणसाचा आपला एक दृष्टीकोन असतो. जर, कोणावर आरोप झाले, तर समोरचा जो डिफेन्सनमध्ये आहे, तो आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार” “सगळे लोक आपपाली बाजू मांडतील. आदित्यने चित्रपटाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं आहे. आदित्यने जे म्हटलय ते तुम्हाला मान्य नसेल, तुम्हाला तो प्रोपेगेंडा, खोटं वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा त्या विरोधात चित्रपट बनवा ना” असं राम गोपाल वर्मा सरळ बोलले.

भारतीय सिनेमाला मार्ग दाखवला

राम गोपाल वर्मा यांनी आदित्य धरचे आभार मानलेत. त्यांनी म्हटलं की, “आदित्य धरने भारतीय सिनेमाला मार्ग दाखवला आहे. त्यांच्या मते धुरंधरला फक्त चित्रपट म्हणणं चुकीच आहे” “मागच्या 20-30 वर्षात असा एकही चित्रपट आलेला नाही. या चित्रपटाची मेकिंग जबरदस्त आहे” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

Follow Us