AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘कार्तिकी’ने सोडली मालिका, पालकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या आहेत. यापैकी कार्तिकीची भूमिका ही साईशा साकारतेय. मात्र तिने ही मालिका सोडली आहे.

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील 'कार्तिकी'ने सोडली मालिका, पालकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
Saisha BhoirImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 11:41 AM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेत दीपा आणि कार्तिकचं नातं निर्णायक वळणावर आहे. कार्तिकीला (Kartiki) कार्तिकच आपले बाबा आहेत हे सत्य कळलं आहे. त्यामुळे आई बाबांनी एकत्र यावं असं तिला मनोमन वाटतंय. मालिकेत या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतानाच आता कार्तिकीची भूमिका साकारणारी बाल कलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) यातून बाहेर पडणार असल्याचं कळतंय. या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या आहेत. यापैकी कार्तिकीची भूमिका ही साईशा साकारतेय. मात्र तिने ही मालिका सोडली आहे. आता मालिकेत कार्तिकीच्या जागी नवी बाल कलाकार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. साईशा बाल कलाकार असली तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत.

साईशाच्या आईवडिलांनी मालिकेविषयीची माहिती देण्यासाठी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह केलं होतं. त्यावेळी त्यांनी कार्तिकीने मालिका का सोडली, यामागचं कारण सांगितलं. “स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेत साईशा आता दिसणार नाही. जरी ती मालिकेतून दिसणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती तुमच्या भेटीला येईल. कार्तिकीच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आम्ही कल्याणला राहतो आणि मालिकेचं शूटिंग मालाडला होतं. दररोज प्रवासात दोन-अडीच तास लागतात. त्यामुळे तिला शाळा आणि अभ्यासासाठी फार वेळ देता येत नाही. तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ लागला”, असं ते म्हणाले.

पहा व्हिडीओ-

साईशा आता मालिकेत जरी दिसणार नसली तरी ती वेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे समजेल. आता मालिकेत साईशाची जागा कोण घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय हर्षदा खानविलकर, विदिशा म्हस्कर, अनघा भगारे यांच्याही भूमिका आहेत.

Follow Us
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....