भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

नेपाळ आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, नेपाळ एअरलाइनच्या एका चुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला. भारतीयांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. भारताच्या दुखत्या नशेवर नेपाळने हात ठेवल्याचे बघायला मिळतंय.

भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..
Nepal Airlines
| Updated on: Apr 30, 2026 | 9:15 AM

भारत नेपाळला कायमच जवळचा मित्र देश म्हणून बघतो. मात्र, आता नेपाळकडून असे काही करण्यात आले की, त्यांना मित्र म्हणण्याचीही लाज वाटत आहे. भारताने ज्याचा विचारही केला नाही, असे घाणेरडे काम नेपाळने केले. नेपाळच्या या पावलामुळे भारतीयांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे. हेच नाही तर यामुळे भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांवर थेटपणे परिणाम झाला. नेपाळ एअरलाइन्सने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या विमान वाहतूक जाळ्याचा एक नकाशा शेअर केला. ज्यात त्यांनी चक्क पूर्ण जम्मू काश्मीर आणि लदाख चक्क पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवले. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी याला भारतीय सार्वभौमत्वाचा अपमान म्हटले. भारतीयांनी संताप व्यक्त केला. नेपाळ एअरलाइनवर दबाव वाढला, भारताने थेट कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर नेपाळ एअरलाइने अखेर सोशल मीडियावरून ती वादग्रस्त पोस्ट हटवण्याचा निर्णय घेतला.

नेपाळ एअरलाइनने ती पोस्ट हटवली. मात्र, इतक्या मोठ्या चुकीबद्दल त्यांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण लगेचच दिले नाही. त्यांनी थोड्यावेळापूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत खेद व्यक्त केला. मात्र, चुकीला माफी नसल्याचे भारतीयांकडून सांगितले जात आहे. जागतिक पातळीवर भारत आता नेपाळविरोधात भूमिका घेण्याचे संकेत आहेत.

मोठ्या वादानंतर नेपाळ एअरलाइनने म्हटले की, सोशल मिडिया चॅनलवर आम्ही नुकताच एक मॅप शेअर केला. तिथे चुकून एक मोठी चूक झाली. त्याकरिता आम्ही मनातून माफी मागू इच्छितो. यासोबतच त्यांनी म्हटले की, ही चूक आमच्या लक्षात येताच आम्ही तात्काळ पोस्ट हटवली. आम्ही आमच्या शेजारच्या देशासोबत मजबूत नाते ठेवण्याकरिता कायमच प्रयत्न करतो. जर आमच्या पोस्टने त्यांचे मन दुखले असेल तर आम्ही मनातून माफी मागतो.

नेपाळ एअरलाइनच्या चुकीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. नेपाळ एअरलाइनने माफी मागतिली, तरीही लोकांचा राग काही कमी होत नाहीये. जम्मू काश्मीर आणि लदाख भारताचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नेपाळ एअरलाइन ते पाकिस्तानचे दाखवण्याची हिमत कशी करू शकते कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारकडूनही नेपाळवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले.

Follow Us