भारताला ज्याची भीती तेच घडतंय, तुर्की, पाकिस्तानसह इस्लामिक राष्ट्र मोठ्या निर्णयाच्या तयारीत..
भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानने तुर्की आणि साैदी अरेबिया यांच्यासोबत संरक्षण करार केला. त्यानंतर त्यांनी याचा मोठा गाजावाजाही केला. आता या संरक्षण कराराबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येतंय.

7 ऑगस्ट रोजी तीन मुस्लिम देशांनी संरक्षण करार केला. या कराराला नाव मक्का संयुक्त रक्षा करार देण्यात आले. नाटो देशांप्रमाणे त्यांनी हा करार केला. या करारानुसार, तीनपैकी एका देशावर जरी हल्ला झाला तर तो तीन देशांवर मानला जाणार असल्याचे स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो फक्त पाकिस्तानच नाही तर थेट तुर्की आणि साैदी अरेबिया यांच्यावरही समजला जाईल. हेच नाही तर तुर्कीचे संरक्षण मंत्री यांनी आता भारतासह जगाचे टेन्शन वाढवले. त्यांनी म्हटले की, या कराराचा विस्तार होऊ शकतो. हा करार सरळ सरळ भारताला केंद्रित करून तयार करण्यात आला नाही, असे सांगितले जातंय. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध बघता भारतासाठी डोक्याला ताण वाढवणारा हा करार आहे. मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. पाकिस्तानी सैन्याला भारताने सळो की पळो करून सोडले होते.
अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, अन्नधान्याची कमी, बेरोजगारी आणि इतर देशांकडून घेतलेले कर्ज यामुळे पाकिस्तानला चांगल्या पद्धतीने समजले की, ते भारतासोबत युद्ध कधीच करू शकत नाहीत. ज्यमुळे त्यांनी भारतासमोर असा डाव टाकला, ज्यामुळे भारत त्यांच्यावर हल्ला करताना चारवेळा विचार करेल.
जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो तुर्की आणि साैदी अरेबियावर केल्याचेही समजले जाईल. पाकिस्तान 80 टक्के शस्त्र पाकिस्तानकडून खरेदी करतो. भारताचे खाडी देशांसोबत संबंध अधिक वाढली आहेत. त्याकरिताच हा करार त्यांच्याकडून करण्यात आला. हा करार म्हणजे कुठे ना कुठे भारतासाठी तणाव नक्कीच आहे.
तुर्की आणि भारताचे संंबंध गेल्या काही दिवसांपासून तशी तणावात आहेत. त्यातच तुर्कीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला. भारतही इस्त्रायलसोबत संरक्षण करार करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, असा कोणताही करार भारत करत नाही किंवा याबाबतची कोणतीही चर्चा भारत आणि इस्त्रायलमध्ये झाली नाही.