
‘माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरून पोस्ट करत अनेकांनी अभिनंदन आणि आनंद साजरा केला. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी हा दर्जा सहा भाषांना मिळाला होता. केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2004 रोजी अभिजात भाषेची श्रेणी जाहीर केली होती.सर्वात आधी तामिळ भाषेला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर 2005 साली संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगु, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता. त्यानंतर नऊ वर्षांनी केंद्र सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. भारतात आता एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू होता. संसदेत वारंवार याबाबतची मागणी होत होती. राज्यातल्या सर्वच पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे काहीतरी आहे, इतकीच...