
Railway Guidelines Ghee: भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तिकीट बुकिंग करण्यापासून ते रेल्वेतून सामान नेण्यापर्यंत त्यांची कसरत सुरू असते. पण रेल्वे प्रवासात सामान नेण्याविषयी काही नियम आहेत. त्यानुसार रेल्वे प्रवासात सामान घेण्याविषयी काही नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठी रेल्वे गाईडलाईन महत्त्वाची आहे. या प्रवासात रेल्वे प्रवासी नेहमी कपडे, खाद्यपदार्थ, सामान आणि इतर घरगुती वस्तू घेऊन जातात. पण त्याविषयीचे नियम त्यांना माहिती नसतात. तूप, तेल, ज्वलनशील पदार्थांची, स्फोटक पदार्थ प्रवासात नेता येत नाही.
पण अनेकांना रेल्वे प्रवासात तुपाचा डब्बा नेता येतो का याविषयीची प्रश्न पडतो. अनेक प्रवाशी त्यांच्या सामानाच्या पिशवीत, बॅगमध्ये तुपाचा डब्बा घेऊन जातात. पण रेल्वे नियमानुसार प्रवासात तूप, तेल खरंच नेता येते का? याविषयीचे मार्गदर्शक सूचना काय आहेत.हे माहिती असेल तर तुमचा प्रवास आरामदायक होईल.
रेल्वेत तुपाविषयीचा काय निर्णय?
भारतीय रेल्वेने तुपाचा डब्बा घेऊन जाण्याचे नियम स्पष्ट आहेत. प्रवाशी ट्रेनमध्ये तूप घेऊन जाऊ शकतात. पण त्याची एक मर्यादा आहे. रेल्वेच्या नियमानुसार, एक प्रवाशी कमाल 20 किलोपर्यंत तुपाचा डब्बा घेऊन जाऊ शकतात. पण त्यासाठी अर्थातच रेल्वे अधिकाऱ्याची, प्रशासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तुपाचा डब्बा हा चांगला पॅक असावा. तो घट्ट बंद असावा.
पॅकिंग एकदम चांगले हवे. हा तुपाचा डब्बा उघडायला नको. तो सांडायला नको. उघड्या भांड्यात अथवा कमकुवत डब्ब्यात, प्लास्टिक बॉटलमध्ये तूप असायला नको. जर सुरक्षित पॅकिंग नसले तर रेल्वे प्रशासन असा तुपाचा डब्बा जप्त करू शकते. त्यामुळे डब्बा हा योग्यरित्या बंद हवा.
हा नियम कशासाठी ?
तूप हे दिसायला साधं वाटतं. पण ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ तसेही आणू देत नाहीत. कारण यामुळे जोखिम निर्माण होऊ शकते. जर तूप सांडले तर त्यावर प्रवासी घसरून पडू शकतात. तर तूप हे ज्वलनशील असल्याने आगीचा धोकाही असतो. त्यामुळे पॅकिंगविषयी नियम कडक आहेत. जर 20 किलोंपेक्षा अधिक तूप नेल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे रेल्वेत अशा वस्तू नेण्याअगोदर नियम जाणून घेणे फायदेशीर ठरेल.