सांगली ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील आणखी 5 मृतदेह हाती, मृतांचा आकडा 17 वर

| Updated on: Aug 10, 2019 | 1:52 PM

पलूसमधील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.  गुरुवारी 8 ऑगस्टला ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मोठा अपघात झाला होता

सांगली ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील आणखी 5 मृतदेह हाती, मृतांचा आकडा 17 वर
सांगली बोट दुर्घटना
Follow us on

Brahmanal Boat Overturn सांगली : पलूसमधील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.  गुरुवारी 8 ऑगस्टला ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेनंतर नेमके किती लोक वाहून गेलेत याचाच नेमका आकडा माहीत नाही.  अपघाता दिवशी 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अपघाताच्या दिवशी  9 मृतदेहच सापडले होते. मग दुसऱ्या दिवशी 3 मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर आज शनिवारी 5 मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.

सांगलीमध्ये महापूर (Sangli Flood) आल्यामुळे थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ब्रह्मनाळ या गावात बोट उलटून (Brahmanal Boat Overturn) अनेकांचा मृत्यू झाला होता. ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली. बुडालेली बोट ग्रामपंचायतीची होती.

PHOTO : बुडालेल्या बोटीचे फोटो, चिखलाने भरलेलं गाव, कसं आहे ब्रह्मनाळ?

सांगलीतील 4 तालुक्यांना पुराचा वेढा आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पाणी शिरलं होतं. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यामुळे बोटीला दुर्घटना झाली.

नेमकं काय घडलं?

नदीपात्रापासून दीड किलोमीटरपर्यंत 15 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. ब्रह्मनाळमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होतं. ब्रह्मनाळ आणि वसगडे या गावांचा प्रवास ग्रामपंचायतीची  नावेने केला जातो.  वर्षभर इथली वाहतूक अशाच पद्धतीने होते. पुरामुळे या भागात सध्या वीजेचे खांब, मोठ मोठी झाडं शेंड्यापर्यंत बुडाली आहेत. त्यामुळे नेमकी बोट कुठल्या दिशेने न्यायची हेच लक्षात आलं नसावं. ग्रामपंचायतीच्या  बोटीतून नेहमी वाहतूक होत असली तरी पुराच्या पाण्याने मार्ग समजण्यास अडथळा येत होता.

मंदीर, झाड, कठडे पाहून अंदाजाने मार्गक्रमण सुरु होते.त्यावेळी बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात पलटी झाली. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. खासगी बोटीत तशी व्यवस्थाच नव्हती. नियमित सवयीप्रमाणे ही बोट नेली जात होती.

पाण्याची स्थिती इतकी भीषण आहे की बोट पलटी होताच अनेक जण वाहून गेले. मोठी झाडं पाण्यात गेलेत, वीजेचे खांब पाण्यात गेलेत त्यामुळे जायचं कुठं हेच कळत नव्हतं.  बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला आणि बोट पलटली.

संबंधित बातम्या  

Sangli Boat Overturn | काईलीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले,घटनास्थळी काय घडलं?

Sangli Boat Overturn : सांगली बोट दुर्घटना : बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला, बोट पलटली, नेमकं काय झालं?

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू  

PHOTO : बुडालेल्या बोटीचे फोटो, चिखलाने भरलेलं गाव, कसं आहे ब्रह्मनाळ?