AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळी; टीम इंडिया 2 बाद 288 धावा

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने 2 गडी गमवून 239 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलच्या शतकामुळे भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड आहे.

IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळी; टीम इंडिया 2 बाद 288 धावा
IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 15, 2026 | 6:19 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 गडी गमवून 288 धावा केल्या. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. पण दुर्देवाने यशस्वी जयस्वाल 32 धावांवर असताना धावचीत झाला. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील संवादाच्या अभावामुळे टीम इंडियाला एक विकेट गमवावी लागली. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. 47 धावांवर यशस्वी जयस्वालची विकेट पडली होती. देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आली.

केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांची जोडी जमली होती. केएल राहुल 162 चेंडूंचा सामना करून 77 धावांवर खेळत होता. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला होता. पण टी ब्रेकनंतर मैदान उतरल्यानंतर वारंवार क्रॅम्प येत होते. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि वेदना असह्य झाल्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला गेला. देवदत्त पडिक्कलने अर्धशतकी खेळी करून आधीच जम बसवला होता. त्यानंतर त्याने कर्णधार शुबमन गिलसोबत डाव पुढे नेला. तसेच कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक साजरं केलं. त्याच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या 200 पार धावा झाल्या. कर्णधार शुबमन गिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याच्याकडून अपेक्षा भंग झाला. त्याने 28 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा करून बाद झाला. प्रभात जयसूर्याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

श्रीलंकेकडून फक्त प्रभात जयसूर्याला 1 विकेट मिळाली. या व्यतिरिक्त सर्व गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. शुबमन गिल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. ऋषभ पंतने पाच चेंडू खेळले नाही तोच पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. त्यामुळे काही काळ पाऊस जाण्याची वाट पाहावी लागली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा देवदत्त पडिक्कल नाबाद 131 आणि ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होता.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?