हाताला काम नाही, भुकेला अन्न नाही, लेकराबाळांसह पायपीट करत असंख्य कुटुंबीय गावाला रवाना

| Updated on: Mar 29, 2020 | 11:28 PM

सरकार आज काही देत नाही मग काय मरणानंतर देणार का? असा उद्विग्न सवाल मध्यप्रदेशकडे निघालेल्या व्यक्तीने विचारला (Many Worker move to village)आहे.

हाताला काम नाही, भुकेला अन्न नाही, लेकराबाळांसह पायपीट करत असंख्य कुटुंबीय गावाला रवाना
Follow us on

भिवंडी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 21 दिवसांकरिता लॉकडाऊनची (Many Worker move to village) घोषणा करण्यात आली आहे. देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर त्या ठिकाणी घरात थांबून राहावे असे आवाहन पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबियांची परवड सुरु झाली आहे. काम नसल्याने कामगारांचे मालक त्यांना पैसे देत नाही. त्यामुळे खायचे कसे या विवंचनेत असलेल्या कुटुंबियांनी वाहतूक सेवा बंद असतानाही लेकराबाळांसह पायपीट करत घराकडची वाट धरली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीक (Many Worker move to village) महामार्गावर असे असंख्य कुटुंबीय सापडले होते. यातील अनेक जण काम नसल्याने मालक पैसे देण्यास तयार नसल्याने निराश झाले आहे. या ठिकाणी जगायचे कसे या विवंचनेत कोणी बुलडाणा, अमरावती तर कोणी थेट 500 किलोमीटर अंतरावरील मध्यप्रदेशातील घराकडे निघाले आहेत.

नेवाळी कल्याण येथे मोलमजुरी करणारे कुटुंब रणरणत्या उन्हात अंगाला चटके लागू नये म्हणून अंगावर एकावर एक कपडे चढवून मार्गक्रमण करीत होते. सरकार आज काही देत नाही मग काय मरणानंतर देणार का? असा उद्विग्न सवाल मध्यप्रदेशकडे निघालेल्या व्यक्तीने विचारला आहे.

या रस्त्यावर असे असंख्य कुटुंबियांचे तांडे पाहायला मिळत आहे. यातील कोणी पनवेल तर कोणी अंबरनाथ येथून लहान मुले तर पाच सात वर्षांची मुले उन्हात अनवाणी रडत या मार्गाने पायपीट करत आहे. तर आपल्या डोक्यावर आपल्याजवळील कपड्यांची बोचकी घेऊन आपल्या गावाच्या ओढीने निघाले (Many Worker move to village) आहेत.