AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब; राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. | governor bhagat singh koshyari

विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब; राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Updated on: Dec 01, 2020 | 11:20 PM
Share

नवी दिल्ली: विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Public interest litigation in SC over delay in 12 MLC induction in Maharashtra)

प्राथमिक माहितीनुसार, अधिवक्ते राज पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. 12 राज्यपाल नियुक्ती विधान परिषद आमदार च्या नियुक्तीला होत असलेला विलंब, भारतीय संविधानानुसार उमेदवारांची पात्रता आदी विषय याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. तसेच विधानपरिषदेतील आमदारांची निवड ही संवैधानिक पात्रतेनुसार नव्हे तर राजकीय आधारावर केली जाते, यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी देऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यानंतर कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना अधूनमधून याची आठवण करुन देत असतात.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांनी विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेली 12 नावे योग्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाने केलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाही, अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्था आणि प्रथा मोडण्यात भाजपचा हातखंडा आहे. परंतु, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे असल्याने ते लवकरच मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, अशी खोचक टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली होती.

‘झहीर खान, मकरंद अनासपुरे, इंदोरीकरांना आमदार करा’

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचविली होती. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या:

राज्यपालनियुक्त आमदारांची केस आता हायकोर्टात

पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही; खडसेंचा भाजपला टोला

जुन्या परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा; राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून जयंत पाटलांचा टोला

(Public interest litigation in SC over delay in 12 MLC induction in Maharashtra)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.