AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबनेही लॉकडाऊन 1 मेपर्यंत वाढवला, महाराष्ट्र, कर्नाटक ते दिल्ली, कोणत्या राज्याचं काय मत?

दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनाही लॉकडाऊनची मुदत वाढवून हवी आहे, तर राजस्थान टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मताचं आहे. (Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)

पंजाबनेही लॉकडाऊन 1 मेपर्यंत वाढवला, महाराष्ट्र, कर्नाटक ते दिल्ली, कोणत्या राज्याचं काय मत?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 10, 2020 | 5:29 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेणार आहेत. देशभरातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा, याचा फैसला उद्या होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याची भूमिका यामध्ये महत्वाची असेल. पंजाबने राज्यातील लॉकडाऊन आणि संचारबंदी 1 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)

14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून उमटला आहे. ओदिशाने आधीच 30 एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. कर्नाटकही महिनाअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने आहे. मात्र अंतिम निर्णय पंतप्रधानसोबत चर्चा करुन घेणार आहे. दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनाही लॉकडाऊनची मुदत वाढवून हवी आहे, तर राजस्थान टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मताचं आहे.

देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे 14 तारखेनंतरही लॉकडाऊन हवा, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. कोरोनाचा जिथून फैलाव झाला, त्या चीनमधील वुहानमध्ये झालेल्या 76 दिवसांच्या लॉकडाऊनचा दाखला कालच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

दरम्यान, रेल्वे सुरु करायची की नाही, याचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वेसेवा सुरु होण्याबद्दलचे मीडियातले सगळे रिपोर्ट रेल्वे मंत्रालयाने फेटाळले आहेत.

लॉकडाऊनबद्दल राज्ये काय म्हणतात ?

ओदिशा – 30 एप्रिलपर्यंत वाढ पंजाब – 1 मेपर्यंत वाढ कर्नाटक – 30 एप्रिलपर्यंत वाढवा महाराष्ट्र – लॉकडाऊन वाढवा मध्य प्रदेश – लॉकडाऊन वाढवा दिल्ली – लॉकडाऊन वाढवा तेलंगणा – लॉकडाऊन वाढवा हरियाणा – लॉकडाऊन वाढवा केरळ – लॉकडाऊन वाढवा राजस्थान – टप्प्याटप्प्याने हटवावा

(Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार