तिवरे धरणफुटीमागील खरा ‘खेकडा’ कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती

| Updated on: Dec 23, 2019 | 10:18 AM

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीचा (Tiware Dam breached) अहवाल येत्या आठ दिवसात सरकारला सादर होणार आहे. जलसंधारण विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

तिवरे धरणफुटीमागील खरा खेकडा कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीचा (Tiware Dam breached) अहवाल येत्या आठ दिवसात सरकारला सादर होणार आहे. जलसंधारण विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या अहवालामुळे तिवरे धरणफुटीमागचा खेकडा कोण हे स्षष्ट होणार आहे. सरकारला सादर होणारा अहवाल पूर्णतः गोपनीय असेल. तिवरे धरण फुटल्याने (Tiware Dam breached) भेंदवाडीतल्या 23 जणांचा बळी गेळा होता. या दुर्घेटनेच्या तपासणीसाठी सरकारने एसआयटी नेमली होती. या चौकशी समितीने तपास करुन अपला अहवाल तयार केला आहे.

तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख होते. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. त्यामुळे दुर्घेटनेत ठपका कुणावर याची जिल्हावासीयांना उत्सुकता लागली आहे.

तिवरे धरण दुर्घटना

कोकणातील तुफान पावसाने जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून नेले. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली.  या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. 

चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं.  धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली.

तिवरे धरण

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर होती. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

संबंधित बातम्या  

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?

तिवरे धरण खेकड्यानी फोडलं, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा 

तिवरे धरणग्रस्तांची थट्टा, अधिकारी म्हणतात – वाहून गेलेल्या वस्तूंची बिलं आणा