
पाकिस्तानने शुक्रवारी केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा 20 वर्षीय जवान ऋषीकेश जोंधळे आणि नागपूरचा 28 वर्षीय वीर भूषण सतई हे धारातीर्थी पडले. या दोन्ही शहीद जवानांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले

या अखेरच्या निरोपासाठी अवघं गाव मोठ्या संख्येनं जमा झालं होतं.

यावेळी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

शुक्रवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चकमकीत शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि भूषण सतई या दोन जवानांना वीरमरण आलं.

आज भाऊबीजेच्या सणादिवशी जड अंतरकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता या शूर योद्धांना अखेरचा सलाम देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.

शहीद जवानऋषिकेश जोंधळे यांनी अवघ्या 20 व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांच्या शौर्याला आज उभा महाराष्ट्र सलाम करत आहे.

काटोलमध्ये शहीद जवान भूषण सतईंच्या अंत्ययात्रेमध्येही जनसागर लोटला होता.

गृह मंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी मानवंदना देत शहीद जवान भूषण सतई यांना अखेरचा निरोप दिला.