
मेघालय हे आपल्या भारतातील खूप सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. जर तुम्हाला पावसाळ्यात उत्तराखंड आणि हिमाचलला भेट द्यायची नसेल, तर तुम्ही मेघालयामध्ये फिरण्याचा प्लॅन करू शकतात. मेघालयापासून काही तासांच्या अंतरावर एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एका वेगळ्याच जगात आले आहात. हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.
आपण मेघालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या चेरापुंजीबद्दल बोलत आहोत. निसर्गप्रेमींसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण असू शकते. पावसाच्या ओलाव्याने भिजलेले डोंगर, आजूबाजूला हिरवळ, धबधब्यांचा गोड आवाज आणि ढगांच्या मागे लपलेल्या सूर्याची किरणे. चेरापुंजीचे प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रातून बाहेर पडून वास्तवात आल्यासारखे वाटते. हे ठिकाण केवळ निसर्गप्रेमींसाठी खास नाही तर शांती, आराम आणि साहस एकत्र शोधू इच्छिणाऱ्यांसाठी देखील आदर्श आहे. चला तर मग जाणून घेऊया येथे कसे पोहोचायचे आणि त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही कोणती ठिकाण पाहू शकाल…
चेरापुंजी हे जगातील सर्वात जास्त पावसाळी भागात गणले जाते, परंतु या ठिकाणाचे सौंदर्य केवळ पावसापुरते मर्यादित नाही. मेघालयाची राजधानी शिलाँगपासून सुमारे 2-3 तासांच्या अंतरावर असलेले हे छोटेसे हिल स्टेशन अजूनही त्याचे पारंपारिक सौंदर्य टिकवून ठेवते. लिव्हिंग रूट ब्रिज, नोहकालिकाई धबधबा, मावसमाई गुहा आणि डावकी नदीचे निळे पाणी यासारखे नैसर्गिक चमत्कार या ठिकाणाला आणखी खास बनवतात.
येथे पाहा पोस्ट –
लिव्हिंग रूट ब्रिज – झाडांच्या मुळांपासून बनवलेला हा नैसर्गिक पूल खूपच अनोखा आहे. खासी जमातीचे लोक पिढ्यानपिढ्या या मुळांना एकत्र जोडून पूल बनवत आहेत, जे पाहण्यासारखे आहे.
नोहकालिकाई धबधबा – भारतातील सर्वात उंच एकमेव धबधबा. हा धबधबा इतक्या उंचीवरून पडतो की पाहणारे आश्चर्यचकित होतात. त्याची कहाणी तितकीच मनोरंजक आणि रहस्यमय आहे.
मौसमई आणि अरवाह लेणी- या चुनखडीच्या लेण्यांमध्ये जाणे हे एखाद्या साहसापेक्षा कमी नाही. या लेण्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत आणि आतील रचना पाहून तुम्ही थक्क व्हाल.
डावकी नदी- चेरापुंजीपासून थोड्या अंतरावर असलेली ही नदी इतकी स्वच्छ आहे की त्यातील बोट हवेत तरंगताना दिसते. येथील बोटिंगचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो.
चेरापुंजीला जाण्यासाठी, तुम्हाला प्रथम शिलाँगला पोहोचावे लागेल. तुम्ही टॅक्सी किंवा लोकल बसने शिलाँगहून चेरापुंजीला 2 ते 3 तासांत पोहोचू शकता. वाटेत ढग, पर्वत आणि दऱ्या तुमचे मन जिंकतील.
चेरापुंजीला भेट देणे हे वर्षभर सुंदर असते, परंतु पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर येथील सौंदर्य शिगेला पोहोचते. मात्र पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी निसरडेपणा येऊ शकतो, म्हणून तेथे गेल्यावा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.