
पावसाळा येताच हवामान खूप आल्हाददायक होते. कडक उन्हात पाऊस पडतो तेव्हा शरीर आणि मनाला आराम मिळतो. जरी हा ऋतू उष्णतेपासून आराम देत असला तरी तो आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. पावसाळ्याच्या दिवसात आहाराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. त्याच वेळी पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या देखील वाढतात.
वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे आपली त्वचा खराब होते. त्वचेतील चिकटपणा देखील खूप वाढतो. यामुळे आपली त्वचा निर्जीव दिसू लागते. बऱ्याचदा मुली त्वचेवरील तेलकटपणा दुर करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही या त्वचेच्या समस्येपासून मुक्त व्हाल चला तर मग त्या टिप्सबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात –
पावसाळ्यात काकडीचे सेवन आपण करत नाही, पण तुम्ही त्याचा रस चेहऱ्यावर लावू शकता. ते तुमच्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. काकडीचा रस तुमच्या त्वचेला थंडावा देईल. यासोबतच चिकटपणाची समस्याही दूर होईल. काकडीचा रस दिवसातून एकदा चेहऱ्यावर लावावा.
जर तुमची त्वचा चिकट होत असेल तर पावसाळ्यात कमीत कमी तीन ते चार वेळा चेहरा धुवावा. यामुळे घाम कमी होईल. तसेच संसर्गाचा धोका राहणार नाही. बाहेरून आल्यावर या टिप्स नक्की फॉलो करा.
चिकट त्वचेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीची मदत घेऊ शकता. खरं तर मुलतानी माती आपल्या त्वचेला थंड करते. ते त्वचेतील अतिरिक्त तेल देखील शोषून घेते. यामुळे आपली त्वचा चमकदार दिसते. आठवड्यातून दोन दिवस मुलतानी मातीचा पॅक लावा.
पावसाळ्यात स्क्रबिंग करणे आवश्यक आहे . यामुळे मृत त्वचेच्या पेशी चेहऱ्यावरून सहज निघून जातात. याशिवाय, तेलकट त्वचेच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यास देखील मदत होते. तुम्ही आठवड्यातून एकदा स्क्रब करू शकता.
पावसाळ्यात तुम्ही नेहमीच हलका मेकअप करायला पाहिजे. खरं तर, पावसाळ्यात आर्द्रतेमुळे मेकअप चिकट होऊ शकतो . जर तुम्ही हलका मेकअप केलात तर तुमची त्वचा चिकट वाटणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)