Aaditya Thackeray: संघर्ष सुरू होता तेव्हाही आम्ही अयोध्येला जायचो, आता संघर्ष संपलाय; आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला

| Updated on: May 10, 2022 | 3:33 PM

Aaditya Thackeray: आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत.

Aaditya Thackeray: संघर्ष सुरू होता तेव्हाही आम्ही अयोध्येला जायचो, आता संघर्ष संपलाय; आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अयोध्या (ayodhya) दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला असतानाच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनीही राज यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे, यावर काय सांगाल? असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर, मी संपलेल्या विषयावर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जेव्हा संघर्ष सुरू होता, तेव्हा आम्ही अयोध्येला जात होतो. आता संघर्ष संपलाय. आता आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे अदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नांदेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मंत्री उदय सांमत यांच्यासह स्थानिक खासदार .आमदारांची उपस्थिती होती. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ही बोचरी टीका केली.

आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत. कोव्हिडचं एवढं मोठं संकट आलं. पण आम्ही थांबलो नाही. रायगडाला आम्ही सहाशे कोटी रुपये दिले. शेतकऱ्याची कर्जमाफी केली. पण त्याची प्रसिद्धी झाली नाही. पुढच्या वेळेला उपजिल्हा रुग्णालयाचे काम करणाऱ्या मंडळींचा सत्कार करू. धर्म, हिंदू म्हणजे काय हे शिकण्याची आम्हाला गरज नाही. सेवा आमचा धर्म आहे. आपण खंबीरपणे आमच्या मागे रहा, नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमची कामे आवडतात की नाही आवडत असतील तर दोन्ही हातवर करा. नवा महाराष्ट्र घडवू, असं आवाहनही त्यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

10 जूनला अयोध्येला जाणार

राज ठाकरेंना अयोध्येत येण्यासाठी भाजपकडून प्रखर विरोध होत आहे. यावर मी बोलणार नाही. मात्र, महाविकास आघाडीने केलेल्या कामांसाठी आणि रामराज्यासाठी प्रभुरामचंद्राचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण 10 जूनला आयोध्येत जाणार असल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी केलयं. यावेळी आदित्य यांनी राज यांच्या दौऱ्यावर भाष्य करणे टाळलं.

आम्ही विकासकामांचा भोंगा लावतो

आघाडीतील तिन्ही पक्ष क्रिकेट टीमसारखे एकत्रं आले आहेत. सर्व बेस्ट ऑफ आहेत, असं कौतुकही आदित्य यांनी केलं. तर, या कार्यक्रमात उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत यांनी विकासकामांचा भोंगा आम्ही लावतो, राजकारणात नाही, अशा शब्दात मनसेवर टीका केली.