
मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती सुरूवातीला देण्यात आली. मात्र, विमान जमिनीवर कोसळताच चार ते पाच मोठे स्फोट झाले. अजित पवार यांना मिळून पाच जण या विमानातून प्रवास करत होते. यापैकी एकही व्यक्त जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. तांत्रिक बिघाड आणि पायलटला न आलेला अंदाज यामुळे हा विमान अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र, या विमान अपघाताबद्दल अजून पूर्ण चाैकशी होणे बाकी आहे. शेवटच्या क्षणी नक्की काय घडत होते, याचाही माहिती पुढे आली. अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या काही अंतरावर असताना कोलमडताना दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात सरकाकडून सीआयडीची स्थापना करण्यात आली. या विमान अपघात प्रकरणात सखोल चाैकशी व्हावी आणि नेमके कारण काय? हे पुढे यावे ही सर्वांचीच इच्छा आहे. या विमान अपघाताच्या चाैकशी संबंधित अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडे सीआयडीने चाैकशी केल्याची माहिती मिळत आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी सचिवांची चाैकशी झाली. सीआयडी अधिकाऱ्यांनी खासगी सचिवांकडे अजित पवार यांच्या बारामती दाैऱ्याची संपूर्ण चाैकशी केली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचा दाैरा कसा होता, ते कुठे कुठे जाणार होते याबाबत सर्व माहिती घेण्यात आली. फक्त हेच नाही तर 27 जानेवारी रोजी रात्री या दाैऱ्याबाबत काही चर्चा अजित पवार यांनी केली होती का? याबाबतही सचिवांना प्रश्न करण्यात आला.
28 जानेवारी रोजीच्या अजित पवार यांच्या प्रवासाचे नियोजन नक्की कोणी केले आणि काय प्लॅनिंग होते, याबाबतची चाैकशी करण्यात आली. सीआयडीचे अधिकारी प्रत्येक बाजूनेत तपास करताना दिसत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा संशय व्यक्त केला.