महापालिकेतील किती कोटी रुपये कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या खिशात, इम्तियाज जलील यांनी स्पष्टचं सांगितलं

एक हजार कोटी रुपये कुणाकुणाला मिळतात, याचा तपशील आम्हाला सांगावा, अशी विचारणा इम्तियाज जलील यांनी केली.

महापालिकेतील किती कोटी रुपये कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या खिशात, इम्तियाज जलील यांनी स्पष्टचं सांगितलं
इम्तियाज जलील
Reporter Datta Kanwate | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 06, 2023 | 4:55 PM

औरंगाबाद : कंत्राटी कामगारांची औरंगाबाद महापालिकेत पिळवणूक होते. त्याला विरोध करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी विभागायी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनं केलं. या आंदोलनात खासदार इम्पिजाय जलील सहभागी झाले होते. इम्पियाज जलील म्हणाले, कामगारांवर अन्याय होत आहे. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचं संगनमत झालंय. कोणाला कामावर घ्यायचं. कोणाला कंत्राट द्यायचं याचं सगळं संगनमत झालं आहे. कंत्राटी कामगारांचे इएसआयसी जमा केली जात नाही.

औरंगाबाद महापालिकेत पंधराशे कामगार आहेत. त्यांचं शोषण होत आहे. याच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडं आलेलो आहोत. अन्याय होत असताना आपण गप्प का बसलात याची विचारणा करणार असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले.

कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असनात अधिकारी गप्प का बसलेत, याची विचारणा करण्यासाठी आलो असल्याचंही इम्तिजाय जलील यांनी सांगितलं. कंत्राटदार हे राजकीय पक्षांचे नातेवाईक आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च या कंत्राटदारांवर होतो. कामगारांचा पगार साडेतीन हजार कोटी रुपये निघतो.

अडीच हजार कोटी रुपये हे कामगारांना वाटण्यात जातात. इतर एक हजार कोटी रुपये कुणाकुणाला मिळतो, याचा तपशील आम्हाला सांगावा, अशी विचारना इम्तियाज जलील यांनी केली.

ईएसआयसी, पीएफ, मिनिमम वेजेस अॅक्टनुसार वेजेस दिले गेले पाहिजे. अन्यथा मोठं आंदोलन उभं करणार असल्याचा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबादमध्ये कंत्राटी कामगारांनी आंदोलन केलं. या आंदोलनाचे नेतृत्व इम्तियाज जलील यांनी केलं. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. कामगार आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Follow Us