Video Bhandara Accident | तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्ग रखडले, आठवड्यात पाच अपघात; 2 ठार, 12 जखमी

| Updated on: May 21, 2022 | 2:53 PM

रात्री अज्ञात ट्रकनं एका दुचाकीचालकास उडविले. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. बाजूला बसलेला जखमी झाला. जखमी व मृतक हे तिरोडा तालुक्यातील रहिवासी होती. काम आटोपून गावाकडं जात होते. रात्रीची वेळ होती. शिवाय बांधकाम अपूर्ण आहे. यामुळं हा अपघात झाला.

Video Bhandara Accident | तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्ग रखडले, आठवड्यात पाच अपघात; 2 ठार, 12 जखमी
तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्ग रखडले
Image Credit source: t v 9
Follow us on

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तुमसर-रामटेक (Tumsar-Ramtek) राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. सालई खुर्द-उसर्रा (Salai-Khurd) जवळ दुचाकीवरून प्रवास करताना अज्ञान ट्रकने धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. तिरोडा (Tiroda) तालुक्यातील मुंडीकोटा येथील सोमेश्वर भलावे (वय 40)असे मृतकाचे नाव आहे. तिरोडा तालुक्यातील सोनेवाग येथील आशिष गौतम (वय 28) जखमीचे नाव आहे. तिरोडा तालुक्यातील मृतक व जखमी हे काही कामानिमित्त मोटारसायकलने रामटेकमार्गे आले होते. काम आटोपून स्वगावाकडे जात असताना सालई खुर्द गावाजवळ अज्ञात ट्रकने मोटारसायकला जबर धडक दिली. यात सोमेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला तर आशिष गंभीर जखमी झाला. जखमीला उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचार सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ

राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम रखडले

तुमसर ते रामटेक या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. सालई (खुर्द) उसर्रा या रस्त्यावर रात्री अपघात झाला. एका बाजूचे बांधकाम सुरू असल्यानं हा अपघात झाला. रात्री अज्ञात ट्रकनं एका दुचाकीचालकास उडविले. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. बाजूला बसलेला जखमी झाला. जखमी व मृतक हे तिरोडा तालुक्यातील रहिवासी होती. काम आटोपून गावाकडं जात होते. रात्रीची वेळ होती. शिवाय बांधकाम अपूर्ण आहे. यामुळं हा अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

आठवड्यात पाच अपघात

तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्ग रखडले आहे. एकेरी वाहतुकीमुळे येथे रोज अपघात होतात. गेल्या आठवड्याभरात याठिकाणी पाच अपघात झाल्याची माहिती आहे. या वेगवेगळ्या अपघातात बारा जण जखमी झाले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं महामार्ग मृत्यूचा सापडा झाल्याची टीका स्थानिक करतात. रोज अपघात होणार असल्यानं हा महामार्ग केव्हा एकदा पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.