टीका करणारे दगड फेकतात, पण मी कासवासारखा… देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, माझी चाल..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना फडणवीस दिसले. आपली भूमिका कासवाप्रमाणे असल्याचे म्हटले. कासवाचा वेग नाही पण कासवासारखे कवच आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले.

टीका करणारे दगड फेकतात, पण मी कासवासारखा… देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, माझी चाल..
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 20, 2026 | 2:00 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये फडणवीस विरोधकांबद्दल बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, माझी प्रेरणा ही कासव आहे… माझी स्पीड कासवाची नाही पण प्रेरणा कासवाची आहे. कारण धोका आला कुणी दगड मारला की आपल्या कवचामध्ये कासवासारखा जातो आणि परत बाहेर येतो… देवेंद्र फडणवीस यांनी हे अत्यंत मोठे विधान केले. फडणवीस यांनी म्हटले, मला दिवसभर भेटणारे लोक, राज्यात उद्योग सुरु करणारे उद्योजक आणि माझ्या परिवारात बायको आणि मुलगी हे कायम काम करण्यासाठी ऊर्जा देत असतात. नागपूरात आम्ही लोक घरांचा पत्ता विचारत नाही कोण कोणाच्या घराजवळ राहतो असे आम्ही पत्ता सांगतो. माझी अनेक मित्र असे आहेत की त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्री नाही. अनेक लोक मला सांगतात की हे बरोबर नाही, असे ते सांगतात.

अनेकदा लोक मोठ्या पदावर लोक गेल्यावर ते स्वत:बद्दल चुकीचे काही एकण्याची तयारी ठेवत नाहीत. पण मी सर्व ऐकण्याची तयारी ठेवतो. आपल्या चुकीच्या गोष्टीही लोकांनी आपल्याला सांगितल्या पाहिजेत. महायुतीचे सरकार आहे. आपण पुर्ण मनाने एखादे काम केले. तर सहयोगी पक्ष मदतीला येतात. मी समृद्धी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सहयोगी पक्षांनी मला सहयोग केला.

ते माझ्यासोबत कायम राहिले. पण शरद पवार यांनी तेव्हा विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी देखील विरोध केला जेव्हा की ते आमचे महायुतीचे भाग होते. पण मी माझ्या ध्येयाला धरून काम करत राहिलो. आज समृद्धी महामार्ग तयार झाला. एका वर्षात आम्ही जमीन अधिग्रहित केल्या, जे लोक विरोधात बोलायचे ते आज या प्रकल्पाचे गुणगान गात आहेत. सगळ्या विरोधकांचे तोंड बंद झाले.

मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस वे ला आम्ही समांतर रोड तयार करणार आहोत. ठाणे बोरीवली हा नवा मार्ग तयार करतोय, नवे भुयार तयार केले जात आहे. आता बुलेट ट्रेन आणि मुंबई विमानतळ जोडणार आहेत. मुंबईत कोणीही कुठे 45 मिनिटात पोहचू शकेल असा आमचा प्रयत्न आहे. तिसरी मुंबई आम्ही तयार करतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us