एका दिवसात कोरोनाचे 5 रुग्ण सापडले, चाचण्या वाढवल्या, इतर साथींच्या आजरांमुळे आरोग्य विभागाची दमछाक

| Updated on: Mar 15, 2023 | 12:05 PM

राज्यातील वातावरणात मागच्या काही दिवसांपासून फरक पडला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे, त्यामुळे संसर्गजन्य आजारांनी पुन्हा डोकेवरती काढले आहे.

एका दिवसात कोरोनाचे 5 रुग्ण सापडले, चाचण्या वाढवल्या,  इतर साथींच्या आजरांमुळे आरोग्य विभागाची दमछाक
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: tv9marathi
Follow us on

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : जिल्ह्यात कोरोनाने (covid patient) पुन्हा डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत पाच रुग्ण (nandurbar corona patient) आढळल्याने आले आहेत, त्यामुळे आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेतील (Nandurbar Zilla Parishad) एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कार्यालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर, पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. कोरोना पुन्हा सक्रीय झाल्यामुळे चाचणी वाढवणे गरजेचे झालं आहे, तर दुसरीकडे तापमान बदलत असल्याने मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण अधिक रुग्णालयात येत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनवर मात करण्यासाठी अधिक तयारी करून ठेवली आहे. मात्र रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

संसर्गजन्य आजार सुध्दा वाढले आहेत

मागच्या तीन वर्षात आपण जी काळजी घेतली होती. त्याचपद्धतीची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कारण कोरोना पुन्हा सक्रीय झाल्यामुळे अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मागच्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्यामुळे संसर्गजन्य आजार सुध्दा वाढले आहेत.

नाशिकमध्ये संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

देशभरात कोरोना व H3N2 चे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव व परिसरात ताप, थंडी, सर्दी, हातपाय दुखणे व खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयात रुग्णाची उपचारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. जरी राज्यात मास्क सक्ती नसलेला पण गर्दीच्या ठिकाणी गरज असेल तरच जा, जातांना मास्कचा वापरा करा,पाणी उकळून गळून प्या तसेच तोंडाला नाकाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याचे आव्हान लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी करत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील वातावरणात मागच्या काही दिवसांपासून फरक पडला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे, त्यामुळे संसर्गजन्य आजारांनी पुन्हा डोकेवरती काढले आहे.