सत्तांतराच्या सात महिन्यातच शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये धुसफूस? कारण…

विधान परिषदेच्या (MLC Election) पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अमरावतीच्या जागेवर भाजप आमदार रणजित पाटील यांचा पराभव झाला.

सत्तांतराच्या सात महिन्यातच शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये धुसफूस? कारण...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:38 PM

बुलढाणा : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सात महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या गटाने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील भाजपने (BJP) महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. हे सत्तांतर झालं, पण त्यानंतर वारंवार सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये (विशेषत: शिंदे गटाच्या आमदारांमध्ये) धुसफुसीच्या विविध चर्चा समोर येत असतात. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होवून सात महिने झाले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. आमदारांची ही नाराजी वारंवार समोरही आलेली आहे. पण अजूनही विस्तार होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे आमदारांमधील ही धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आलीय.

विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अमरावतीच्या जागेवर भाजप आमदार रणजित पाटील यांचा पराभव झाला. या पराभवावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. विशेष म्हणजे रणजित पाटील यांच्या पराभवावरुन शिंदे गटाच्या आमदाराने भाजपवर गंभीर आरोप केलाय.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी रणजित पाटील यांच्या पराभवावरुन भाजपवर आरोप केलाय. या निवडणुकीत आमच्या पक्षाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं गेलं नाही, असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“भाजपने अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं नाही”, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय.

“शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला”, असा स्पष्ट दावा संजय गायकवाड यांनी केलाय.

“बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार, खासदार आहेत. आम्हा कुणाला विश्वासात घेतलं गेलं नाही. आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही”, अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली.

“आम्ही महिन्याभरापूर्वी मतदार याद्या मागितल्या. पण त्या मतदानाच्या चार दिवसआधी मिळाल्या. त्यामुळे मतदारांपर्यंत फार कुणी गेलं नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.

“आम्ही सहजपणे मतदारांच्या मतांची फेरफार जिल्ह्यामध्ये करु शकलो असतो. पण दुर्देवाने आमच्या लोकांना फार विश्वास घेतलं गेलं नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“एखाद्या पदवीधर मतदारसंघाचं आमदार म्हणून 12 वर्ष काम करताना सर्वांना खूश ठेवता येत नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर या गोष्टीचे काहीसे पडसाद पडलेले बघायला मिळतात”, असंदेखील संजय गायकवाड म्हणाले.

शिंदे गटाच्या आमदारांनी याआधीही व्यक्त केलीय नाराजी

विशेष म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. तसेच बच्चू कडू यांनीदेखील मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन नाराजी व्यक्त केलीय. आता संजय गायकवाड यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.