
महाराष्ट्र राज्य मान्सून जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात पाणी शिरले आहे तर अनेक ठिकाणी पूरही आला आहे. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणे भरलेली आहेत.

मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बोराची वाडी गावात अद्यापही पिण्याच्या पाण्याचे संकटसंपलेले नाही. पडत्या पावसात महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदी पार करावी लागत आहे.

मागील काही दिवसात नाशिक जिल्हयातही मुसळधार पाऊस झाला असून गोदावरी नदी भरून वाहत आहेत

नदीच्या पलीकडे असलेल्या विहिरीवरुन महिलांना पाणी आणावे लागत आहे. यासाठी महिलांना पावसात मोठी पायपीट करावी लागत आहे.

अनेकदा या महिला पावसाचे पडणारे पाणीही साठवन करुन ठेवतात व तेच पाणी गाळून पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी उन्हात नाशिक जिल्ह्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या नागरिकांना जाणवत होती.