पुण्यात पुन्हा टोळी युद्ध, वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या, थेट भर रस्त्यावरच..

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामध्येच आता एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध बघायला मिळतंय. थेट वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली.

पुण्यात पुन्हा टोळी युद्ध, वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या, थेट भर रस्त्यावरच..
Pune Crime
| Updated on: May 20, 2026 | 10:50 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर उभे असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. तेव्हापासून आंदेकर टोळी या हत्येचा बदला घेण्याकरिता प्रयत्न करत आहे. वनराज आंदेकर यांना गोळ्या झाडल्यानंतरही त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे. होती. आता वनराज आंदेकर यांच्या हत्येला दोन वर्ष उलटली आहेत. पण हे टोळी युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता धक्कादायक बातमी पुण्यातून येत आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. भर रस्त्यावर ही हत्या करण्यात आली.

बालाजी नगर येथे ही धक्कादायक घटना घडली. भर दिवसा ही हत्या करण्यात आलीये. टोळी युद्धातून खून झाल्याची माहिती मिळत आहे. बालाजी नगर बस स्टॅन्ड येथे खून झाल्याची माहिती समोर आली आहे. भर चाैकात ही हत्या करण्यात आली. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या झाली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के आहे. पुण्यातील टोळी युद्ध काही संपत नाहीये. या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या टोळी युद्धातून करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. याबाबत मोठी माहिती पुढे येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. सतत गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.

त्यामध्येच आता भर चाैकात भर दिवसा टोळी युद्धातून ही हत्या झाली. आंदेकर याचे कुटुंबिय सध्या जेलमध्ये आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध सुरू झाले. या हत्येच्या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच याच टोळी युद्धातून मोठा खून झाला होता.

Follow Us