यांनीच खुपसला भाजपच्या पाठीत खंजीर, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 12, 2022 | 8:07 PM

त्यांनी अडीच वर्ष थांबावं आणि जनतेमध्ये जावं तेव्हा त्यांना कळेल.

यांनीच खुपसला भाजपच्या पाठीत खंजीर, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
चंद्रशेखर बावनकुळे यांची भविष्यवाणी
Follow us on

शाहिद पठाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यातील जनतेशी बेईमानी केली. असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खूपसून राज्यातील जनतेशी बेईमानी केली. जनतेचा मताचा अनादर करीत भाजपासोबतची युती तोडली. राष्ट्रवादीची घडी आणि काँग्रेसचा पंजाच पकडला नाही तर विचारही पकडले. एवढेच नव्हे तर हिंदूत्वाचे विचार सोडून काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विचारवर गेले आहेत. म्हणून भाष्कर जाधवांना असे बोलण्याचा अधिकार नाही. असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्कर जाधवांना लगावला. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते.

सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे अत्यंत वाईट परीस्थितीमध्ये आलेले आहेत. त्यांनी अडीच वर्ष थांबावं आणि जनतेमध्ये जावं तेव्हा त्यांना कळेल. दररोज लोक त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे त्यांनी संयम पाळावा.

आता त्यांनी हातामधी मशाल पकडली आहे. पंजा आहे आणि वरून शरद पवार त्यात तेल ओतण्याचे काम करत आहेत. 2024 मशाल चिन्हाची जमानत जप्त होणार, अशी भविष्यवाणीचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तविली.

उद्धव ठाकरे आपला दिवसभरातील राग सामनाच्या माध्यमातून व्यक्त करतात. ज्या ज्या वेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काही तरी लिहीतात आणि सामना ते छापतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयस घेण्याची गरज नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी कोणती भूमिका घ्यावी हे ते व त्यांच्या मनसे पक्ष यांच्या हा अधिकार आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ते शिंदे व ठाकरे यांना करण्यात आलेल्या चिन्ह वाटपबाबत अद्यापही बोलले नाही.

या प्रश्नावर ते बोलत होते. आमची राज ठाकरेंबरोबर युती नाही. आमची फक्त शिंदे गटासोबत सोबत युती आहे, हे बावनकुळे सांगायला विसरले नाही.