जालना ते जळगाव आता 3 तासांत गाठता येणार, नव्या रेल्वे मार्गाची काय आहे योजना

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रासाठी रेल्वेने मंजूर केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या नव्या 174 किमीच्या मार्गिकेला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिलेली आहे. त्यामुळे सिल्लोड सारख्या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

जालना ते जळगाव आता 3 तासांत गाठता येणार, नव्या रेल्वे मार्गाची काय आहे योजना
Jalna to Jalgaon New Railway Line at a Glance
| Updated on: Aug 12, 2024 | 4:33 PM

रेल्वेच्या अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गासह देशातील सात राज्यातील 14 जिल्ह्यात एकूण आठ नव्या रेल्वे मार्गिकांसाठी एकूण 24,657 कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे. या आठ मार्गिका येत्या 2030-31 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे ऐतिहासिक अंजठा येथील लेण्या आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहेत. जालना ते जळगाव हे अंतर कापण्यासाठी पूर्वी पाच तास लागायचे आता याच प्रवासासाठी तीन तास लागणार आहेत. देशातील सर्वात मोठा बोगदा जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गावर 23.5 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून हा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.या नव्या रेल्वे मार्गामुळे अंजठा लेण्यांना पाहायला जाणाऱ्यांना रेल्वेने जाता येणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनात वाढ होणार आहे.या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गिकेसह आठ नव्या प्रकल्पांना गेल्या शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा