किरीट सोमय्या यांचा नवा आरोप, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणता आणि कसा घोटाळा केला? सोमय्या काय म्हणाले…

| Updated on: Jan 06, 2023 | 2:15 PM

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांनी चुकीची कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पुरावे देखील सादर केले आहे.

किरीट सोमय्या यांचा नवा आरोप, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणता आणि कसा घोटाळा केला? सोमय्या काय म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. किरीट सोमय्या यांनी गैर व्यवहार कसा केला हे सांगत थेट पुरावे दाखवत हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हा घोटाळा झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हणत आता काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला आहे. संजय महादेव अंधारी यांच्या बोगस सह्या करून फसवणूक केली आहे. कोर्टाने कंपनी अॅक्ट नुसार 2013 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामध्ये साईप्रसाद किशोर पेडणेकर, गिरीश रमेश देवणकर, प्रसाद महेश गवस, कैलास प्रशांत गवस यांच्या नावाने समन्स निघाले आहे. सहा फेब्रुवारीला त्यांना समन्स बजावले होते. माझा प्रश्न उद्धव ठाकरे यांना असल्याचे म्हणत ठाकरे सेना पालिका काय चालवायची म्हणत हल्लाबोल केला आहे. ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशन त्यावेळी चुकीचे कागदपत्रे त्यावेळी दिले आहे. त्यानंतर 2017 लाही या कंपनीत जे कागदपत्रे दाखवले त्यात व्यक्ती दुसरी आहे आणि सही आणि फोटो करणारा व्यक्ती दूसरा आहे तो व्यक्ती किशोरी पेडणेकर यांचा भाऊ असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांनी चुकीची कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

पेडणेकर कुटुंबीयांनी जो करारनामा दिला आहे त्यावर संजय महादेव अंधारी यांचा नाहीये, संजय अंधारे यांची नाही.

हे सुद्धा वाचा

तो फोटो संजय कदम यांचा लावला आहे. आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लाखों कोट्यवधी रुपये दिले आहे.

जे कोरोना सेंटर उभारले आहे. त्यात एकही पेशंट नव्हता, आणि असे कुठेच सेंटरही नव्हते असा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

विशेष म्हणजे हे कोरोना सेंटर 12 महिन्यात बंद करण्यात आले आहे. त्यासाठी 2 ते 7 वर्षाची सजा आहे, आणि यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना विनंती करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.