Maharashtra News LIVE : मुंबई -पुणे एसटी बससेवा बंद, राज्य परिवहन महामंडळाचे मोठे आदेश..
Maharashtra News LIVE : गेल्या 4 - 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. आज देखील हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट जारी केलाय. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन
विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन. आंदोलनाला आमदार रोहित पवार, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची राहणार प्रमुख उपस्थिती. सकाळी 11 वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू होणार आंदोलन. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त.
-
इंदिरानगरच्या वृंदावन कॉलनीत जून झाड कोसळले
अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचे काम सुरू. सुदैवाने कोणतीही हानी नाही. सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पावसाला सुरुवात. नाशिकमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.
-
-
राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती
पुढील आदेश येईपर्यंत एसटी बस देखील राहणार बंद. रेल्वे पाठोपाठ पुणे मुंबई एसटी सेवा देखील करण्यात आली बंद. मुंबई पुणे एसटी आणि रेल्वे सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे होत आहेत हाल
-
आयएमडीचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट
पुढील ३ तास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना अलर्ट. नागरिकांनी वीज कडकडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन. भारतीय हवामान विभाग, मुंबईकडून सकाळी ७ वाजता ‘नाऊकास्ट’ इशारा जारी
-
TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण
निदा खान सह दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. रजा मेमन, शाहरुख कुरेशीला दिलासा नाही; निदा-दानिशच्या जामीनावर आज अंतिम सुनावणी. धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या जामीनावर आज निर्णयाची शक्यता. रजा मेमन व शाहरुख कुरेशी यांचे जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळले. निदा खान व दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण. आरोपींना जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड व पीडितांना धमकीचा धोका – सरकारी पक्षाचा दावा
-
-
अंबरनाथमध्ये वालधुनी नदी धोक्याच्या उंबरठ्यावर
ठाणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसांच्या पावसाने वालधुनी दुथडी भरून वाहू लागली. प्राचीन शिव मंदिर कडे जाणाऱ्या पुलाच्या काठोकाठ नदीच पाणी. अंबरनाथ नगरपालिकेकडून शून्य कारभार. पालिकेचे सुरक्षारक्षकच वालधुनी परिसरात नाहीसे. पावसाचा जोर वाढला तर प्राचीन शिवमंदिर कडे जाणाऱ्या पुलावर पाणी येण्यास भीती वाढत्या पाण्यामुळे शिवमंदिराकडे जाणारा मार्ग धोक्यात
-
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नगरसेवक थेट रस्त्यावर.. नाल्यात अडकलेला कचरा काढत केली नालेसफाई
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकग्राम परिसरातील नाल्यात झाडांच्या फांद्या अडकल्याने पाण्याचा प्रवाह खोळंबला होता. शिवसेना नगरसेवक व संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह थेट नाल्यात उतरून सफाई मोहीम राबवली. पालिकेच्या नालेसफाईवर नाराजी व्यक्त करत संबंधित नाल्याचे रुंदीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.
-
पुण्यातील खडकवासला धरणात एक टीएमसी पाण्याची भर
पुण्यातील खडकवासला धरणात एक टीएमसी पाण्याची भर पडली आहे. सतत पडत असलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत आहे. गेल्या दोन दिवसाच्या झालेल्या पावसामुळे एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
-
लोणावळा घाटात भीषण वाहतूक कोंडी; मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना प्रवास टाळण्याचे आवाहन
गेल्या तीन तासांपासून लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घाटमार्गावर जाणे टाळावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
-
पुणे–नाशिक महामार्ग पाण्याखाली ; चाकणजवळील वाकी येथे वाहतूक पूर्ण ठप्प
पुणे आणि नाशिकला जोडणारा महत्त्वाचा पुणे–नाशिक महामार्ग वाकी परिसरात पाण्याखाली गेला आहे. रात्रीपासून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जाणाऱ्या शेकडो कामगारांचा खोळंबा झाला आहे. तर महामार्गावर लगत असणारी दुकाने पाण्याखाली गेली असुन नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावर आल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, प्रशासनाच्या नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत
-
वसई, विरार, नालासोपाऱ्यात आज चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच
वसई, विरार, नालासोपाऱ्यात आज चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. विरार नालासोपारा ट्रकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सेव्ह विस्कळीत झाली आहे. वसई विरार नालासोपारा परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पूर्ण शहर जलमय झाले आहे. अनेक ठिकानी झाड उन्मळून पडले आहेत.
-
वसई सातिवली भोईदा पाड्यातील रस्ते जलमय
वसईतील सातिवली भोईदा पाडा येथील पूर्ण रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रात्रभर वसईत पाऊस कोसळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वसईतील भोईदा पाड्यात पाणी साचले आहे. रस्त्यावर एक ट्रक पाण्यात बंद पडला आहे आणि या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. प्रवासी गुडगाभर पाण्यातून प्रवास करत आहेत.
-
रावेर मध्ये वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू
रावेर शहरातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
गोंदियाच्या सालेकसा – नानव्हा मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद…
गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे… सालेकसा तालुक्यात देखील अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली असून यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहत आहेत.. सालेकसा तालुका मुख्यालय ते नानव्हा मार्ग पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद झालेला आहे… यामुळे परिसरातील चार ते पाच गावांचा सालेकसा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे… मात्र या पुलावरून नागरिकांचा जीवघाना प्रवास सुरूच असल्याचे दिसून येत आहे..
पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प झालीअसून, मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणीचपाणी झालं आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळे हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. तर पुणे शहरात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान पुणे विभागाने वर्तवला आहे. राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर आज शाळांना देखील सुट्टी जाहिर केली. काल रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आजही उपनगरातील अनेक भागांना बसला आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोडवर आज पण पाणी साचले आहे. तर, राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.