AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातल्या बड्या बँकेचा थेट परवाना रद्द, RBI चा तडकाफडकी निर्णय, तुमच्या पैशांचं काय होणार?

RBI Cancels Bank License : आरबीआयने महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेशी भांडवली क्षमता आणि उत्पन्नाची शक्यता नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या बड्या बँकेचा थेट परवाना रद्द, RBI चा तडकाफडकी निर्णय, तुमच्या पैशांचं काय होणार?
RBIImage Credit source: Google
| Updated on: May 19, 2026 | 9:26 PM
Share

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील फलटन येथील द यशवंत सहकारी बँक या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेशी भांडवली क्षमता आणि उत्पन्नाची शक्यता नसल्याने आणि बँकिंग नियमन कायद्याच्या काही तरतुदींचे पालन करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती RBI ने दिली आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत ही बँक आपल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नसल्याचेही केंद्रीय बँकेने म्हटले आहे. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ग्राहकांच्या पैशांच काय होणार?

RBI ने महाराष्ट्राच्या सहकार आयुक्त आणि निबंधक यांना बँक बंद करण्याची आणि परिसमापक नियुक्त करण्याची विनंती केली आहे. RBI च्या माहितीनुसार, बँकेचे 99.02 टक्के ठेवीदार त्यांच्या संपूर्ण ठेवी परत मिळवण्यास पात्र आहेत. DICGC अंतर्गत ठेवीदारांना कमाल 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. DICGC ने 20 एप्रिल 2026 पर्यंत 106.96 कोटी रुपयांचे वितरणही केल्याची माहिती देण्यात आली आहे.

19 मे पासून बँकेचे कामकाज बंद

RBI च्या आदेशानुसार, ही सहकारी बँक 19 मे 2026 रोजी कामकाज संपल्यानंतर सर्व बँकिंग व्यवहार थांबवणार आहे. यापूर्वीही RBI ने अनेक सहकारी बँका आणि NBFC कंपन्यांवर कठोर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी कर्नाटकातील कारवार नागरी सहकारी बँकेचा परवानाही रद्द करण्यात आला होता. तसेच पेटीएम पेमेंट बँकेविरोधातही नियमभंगाच्या कारणावरून मोठी कारवाई झाली होती. त्यानंतर आता आरबीआयने द यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.

याआधीही अनेक बँकांवर आरबीआयची कारवाई

दरम्यान, RBI ने अलीकडेच देशभरातील सुमारे 150 NBFC कंपन्यांचे नोंदणी प्रमाणपत्र (CoR) रद्द केले होते. यामध्ये सर्वाधिक कंपन्या दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील होत्या. RBI च्या या कारवायांमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांविरोधात केंद्रीय बँक कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?