
सातारा : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज ते मराठा आरक्षणासंबंधी निर्णायक आणि शेवटची बैठक घेत आहेत. या बैठकीत त्यांनी सरकारमधील नेत्यांचे थेट नाव घेत टोकाचे आरोप केले. मराठा समाज कुणबी आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभिर आरोप केले आहेत. मला संपवण्याचा प्रयत्त्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक सुरू आहे. मराठा समाजासोबत ही शेवटी बैठक असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे अजूनही आग्रही आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस आहे. आज घेत असलेल्या या निर्णायक बैठकीत त्यांनी सरकारमधील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. मला संपवण्याचा सरकारचा प्लान असल्याचं ते म्हणाले. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील दोन आमदार आणि अजित पवार गटातील दोन आमदारांचा कट असल्याचं ते म्हणाले.
माझा ऐनकाऊंटर करूण किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. याच कारणामुळे मी सलाईन घेणं बंद केलं असल्याचं जरांगे म्हणाले. सरकार माझ्या मरणाची वाट पाहत आहे त्यांना कसही करून मला संपवाचं आहे, यामध्ये सरकारमधील मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर आतापर्यंत केलेला हा सर्वात मोठा आरोप आणि गंभीर आरोप आहे. देवेंद्र फडणवीय यांना माफी मागावी लागली त्यामुळे ते राग काढत असल्याचेही जरांगे म्हणाले.