AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

400 जणांच्या धर्मांतर प्रकरणात मुंबईतील एक जण बेपत्ता, कुटुंबियांना येताय धर्मपरिवर्तनाचे फोन

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या माध्यमातून 400 मुलांचे धर्मांतर केल्याचा दावा केला जात आहे. त्यातील एक कुटुंबीय समोर आले आहे. पोलिसांनी त्यांचा जबाबही घेतला आहे.

400 जणांच्या धर्मांतर प्रकरणात मुंबईतील एक जण बेपत्ता, कुटुंबियांना येताय धर्मपरिवर्तनाचे फोन
Ghaziabad police
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 09, 2023 | 10:00 PM
Share

विजय गायकवाड, मुंबई : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गाझियाबादमधील मशिदीचा मौलवी अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अब्दुल रहमानने अल्पवयीन मुलांवर कट्टरतावाद केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचे धागेदोरे मुंब्रापर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी रहमान याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दुसरा आरोपी हा ठाण्यातील मुंब्रा येथील आहे. यामुळे गाजियाबादची एक टीम मुंब्रामध्ये दाखल झाली. स्थानिक मुंब्रा पोलिसांच्या मदतीने शहानवाज नामक आरोपीचा शोध सुरु झाला. हाच शहानवाज गेल्या आठ दिवसांपासून आपल्या घरी येत नसल्याचं आजूबाजूच्या सर्वच शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

यांनी केला धर्मांतराचा दावा

400 हिंदूंचे मुस्लिम धर्मपरिवर्तन झाले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या 400 पैकी एकजण वसईतील असल्याचे समोर आले आहे. राजेश जानी असे त्याचे नाव आहे. राजेश जानी 25 मे पासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. यासंदर्भात त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कुटुंबियांना फोन

राजेश जानी यांनी इस्लाम कबूल केला आहे. तुम्ही ही इस्लाम कबुल करा, असे त्याच्या कुंटबाला अनोळखी नंबरवरून फोन येत असल्याचे जानी कुटुंबियांनी सांगितले. एक अनोळखी व्यक्ती जानी कुटुंबियांना फोन करून मुस्लिम धर्म किती चांगला आहे, राजेश जानी यांनी इस्लाम कबूल केला आहे, तुम्ही ही विचार करा, असे फोन करत आहे. या फोनची एक अडिओ क्लिप ही समोर आली आहे.

पोलिसांनी घेतले जबाब

वसईच्या माणिकपूर पोलिसांनी राजेश जानी यांची पत्नी, मुलगी, मुलगा यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे जवाब घेतले आहेत. मात्र या सर्व प्रकरणात राजेश जानी सध्या बेपत्ता आहेत.

पोलीस काय म्हणतात

राजेश जानी सध्या बेपत्ता आहे. आम्ही त्यांचा शोध घेणार आहोत. ते मिळाल्यानंतर या सर्व प्रकरणाची खरी सत्यता बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा

400 मुलांच्या धर्मांतर प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक, धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन काय?

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ