8 हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीसाठी तातडीने उपाययोजना करा; ऊर्जा खात्याला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

| Updated on: Apr 19, 2022 | 7:21 PM

राज्यात मागील पाच दिवसांपासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही. ही चांगली बाब असून अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मिती, कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वीजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील

8 हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीसाठी तातडीने उपाययोजना करा; ऊर्जा खात्याला मुख्यमंत्र्यांचे निर्देश
औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करा- मुख्यमंत्री
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी ऊर्जा विभागाने तात्कालीक स्वरूपाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन 8 हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे (8,000 MW thermal power generation) उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी राज्याची सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा (Coal Storage), विजेची आजची आणि भविष्यातील मागणी आणि या अनुषंगाने करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.


या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पाच दिवसांपासून भारनियमन नाही

राज्यात मागील पाच दिवसांपासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही. ही चांगली बाब असून अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मिती, कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वीजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेणार असून घेण्यात आलेल्या निर्णयांचा कार्यपूर्ती अहवाल या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली .

कोळसा साठ्याचे नियोजन करा

केंद्र शासनाने 10 टक्के कोळसा आयातीला मान्यता दिली आहे ही प्रक्रिया गतीने पूर्णत्वाला घेऊन जाऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येणारा पावसाळा लक्षात घेऊन कोळशाच्या साठ्याचे नियोजन करण्यात यावे. राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने महानिर्मितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. उरण येथील गॅस प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

Chandrakant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात “जात” कुणी आणली? राज ठाकरेंचं खरंय, चंद्रकांत पाटलांचा सुरात सूर

Buldhana Accident : बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार एक गंभीर

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 186.72 कोटींचा टप्पा पूर्ण: 24 तासात 1 हजार 247 नव्या रुग्णांची नोंद