Girish Mahajan : एबीव्हीपीचा तळागाळातला कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; वाचा, गिरीश महाजनांची राजकीय कारकीर्द

| Updated on: Aug 09, 2022 | 1:39 PM

गिरीश महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला झाली. तेव्हा ते महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजपाची युवा शाखा) तालुकाध्यक्ष बनले.

Girish Mahajan : एबीव्हीपीचा तळागाळातला कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; वाचा, गिरीश महाजनांची राजकीय कारकीर्द
गिरीश महाजन
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : संकटमोचक अशी ओळख असलेल्या भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील राजकारणी आहेत. ते जामनेरचे विद्यमान आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस (Girish Mahajan) यांच्या मंत्रिमंडळात (2014-19) ते जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री होते. गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे 14व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. तर सलग सहाव्यांदा काम करत आहेत. महाजन यांचा जन्म जामनेर येथे झाला. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून महाजन 1978मध्ये एबीव्हीपीचे सक्रिय सदस्य होते. एबीव्हीपीमध्ये (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) त्यांनी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. तिथे त्यांनी भिंती रंगवल्या आणि राजकारण्यांसाठी प्रचारात्मक पोस्टर वाटले. त्यांची अभाविपच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राजकारण

महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला झाली. तेव्हा ते महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजपाची युवा शाखा) तालुकाध्यक्ष बनले. 1992मध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाजन निवडून आले. 1995मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2014पर्यंत त्यांनी आमदार म्हणून 5वी टर्म काम करत कार्यकाळ पूर्ण केला. महाजन यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सरकारने 12 नोव्हेंबर 2014 रोजी तोंडी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

हे सुद्धा वाचा

शपथ घेताना गिरीश महाजन

गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता त्यांना स्थान देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी एकनाथ खडसे यांच्यासोबतचा त्यांचा वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अंतर्गत राजकारणाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या सोबत गेले. आता जळगावातील या दोन नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांचा सामना नेहमीच सुरू असतो. अलिकडेच राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर खडसे निवडून गेले. त्यानंतर काही काळातच राज्यातले महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतरही या दोन नेत्यांमधील वाद आणि मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता गिरीश महाजन यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यावर एकनाथ खडसेंची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.