Electricity : महानिर्मितीसह इतरही कंपन्याकडून अतिरिक्त वीज उपलब्ध करणार, वाढत्या तापमानात ग्राहकांना दिलासा

| Updated on: Apr 23, 2022 | 12:03 AM

विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालीन नियोजन केले व कमीत कमी भारनियमन व्हावे यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याचे अथक प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमुळे महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही महावितरणला दिली आहे.

Electricity : महानिर्मितीसह इतरही कंपन्याकडून अतिरिक्त वीज उपलब्ध करणार, वाढत्या तापमानात ग्राहकांना दिलासा
महानिर्मितीसह इतरही कंपन्याकडून अतिरिक्त वीज उपलब्ध करणार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : तापमानाच्या वाढत्या पाऱ्यात कोळसा टंचाई व वाढलेल्या मागणीमुळे सुरु झालेले विजेचे भारनियमन (Load Shedding) कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी महानिर्मिती (Mahanirmiti) आणि अदानी (Adani) या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे. महावितरणला महानिर्मितीकडून साधारणत: 6,8॰॰ मेगावॅट पर्यंत वीज मिळत होती, ती 7,5॰॰ मेगावॅटपर्यंत मिळणार आहे तर अदानी पॉवर कंपनीकडून शुक्रवारपासून 1,7॰॰ मेगावॅट वरून 2,25॰ मेगावॅट वीज पुरवठा उपलब्ध होत असून आज मध्यरात्रीपासून 3,॰11 मेगावॅट पर्यंत वीजेची उपलब्धता होणार आहे. दरम्यान, विजेच्या उपलब्धततेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असून उन्हाच्या वाढत्या तापमानातील वीज संकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Additional electricity will be provided by other companies including Mahanirmithi)

कोळसा टंचाईमुळे वीज कमी मिळते

महावितरणकडून राज्यातील 2 कोटी 80 लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची 24,500 ते 25,000 मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी राहिली आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे 2,300 ते 2,500 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी नाईलाजास्तव राज्यात काही ठिकाणी भारनियमन करावे लागले. त्यातही देशात सर्वत्र कोळसा व वीज टंचाईचे स्वरुप तीव्र असल्याने विजेच्या उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती.

ऊर्जामंत्र्यांचे तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत राज्यात किमान भारनियमन व्हावे यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालीन नियोजन केले व कमीत कमी भारनियमन व्हावे यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याचे अथक प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमुळे महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही महावितरणला दिली आहे. महावितरणने केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात व कोळसा टंचाईमुळे वीज संकट ओढवले असताना राज्यातील नागरिकांना भारनियमनातून मोठा दिलासा मिळणार आहे. (Additional electricity will be provided by other companies including Mahanirmithi)

इतर बातम्या

Corona : राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत 68 नवीन कोरोनाबाधीत

Gold Rate Today : सोनं लवकरच 55 हजाराचा आकडा गाठण्याची भीती? शुक्रवारी 250 पेक्षा जास्त रुपयांनी सोनं महागलं