माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा

| Updated on: Aug 12, 2020 | 3:53 PM

आदित्य ठाकरे यांनी इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधत अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभु यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान्य करुन घेतली. थकीत पाणीबिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर 2020 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

मुंबईकरांचे थकीत पाणी बिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत 12 ऑगस्ट 2020 रोजी संपली. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघाचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

आदित्य ठाकरे यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला. अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

हेही वाचा : पद्म पुरस्कार समिती, आदित्य ठाकरे अध्यक्ष, धनंजय मुंडे, सुनील केदार, सुभाष देसाईंसह 9 सदस्य

थकीत पाणी बिल असलेल्या व्यक्तीकडून थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दराने अतिरिक्त रक्कम आकारली जाते. मात्र आता ही दोन टक्के दराने रक्कम आकारली जाणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत तर काहींची पगारकपात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.