अमृता फडणवीसांनी सांगितलं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं कारण

| Updated on: Sep 26, 2022 | 6:15 PM

या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता अभियानासाठी आल्याचा आनंद आहे.

अमृता फडणवीसांनी सांगितलं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं कारण
अमृता फडणवीसांकडून मुंबईत स्वच्छता मोहीम
Image Credit source: t v 9
Follow us on

Tv9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः अमृता फडणवीस सहभागी झाल्यात. मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाते. या मोहिमेत अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी हाती ब्रश घेऊन पुतळ्यावरून फिरविला. पुतळ्यावर बसलेली धूळ दूर केली. बाजूनं पाणी सोडण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम (Swachhta Mission) राबविण्यात आली. यापूर्वीच्या स्वच्छता मोहिमेतही अमृता फडणवीस या स्वच्छता मोहिमेत पाहायला मिळाल्या होत्या.

स्वच्छतेत लक्ष्मीचा वास

अमृता फडणवीस म्हणाल्या, नवरात्रीचा पर्व असून स्वच्छतेला महत्व दिलं जातं. या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता अभियानासाठी आल्याचा आनंद आहे. आपल्या घराप्रमाणेच आजूबाजूच्या परिसरात ही स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवं.

स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा, सरस्वतीचा निवास आहे. एक विनंती करते सर्वांना महाराष्ट्राला स्वच्छ राज्य आणि मुंबईला सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळायला हवं. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

सुरक्षित माता अभियानावर अमृता फडणवीस म्हणाल्या, प्रत्येक घरातील माता सुरक्षित आणि शिक्षित असायला पाहिजे. प्रत्येक मातेची प्रकृती चांगली व सुदृढ असायला हवी.

गरबा परवानगीबाबत

गरबा परवानगीबाबत अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, बारा वाजेपर्यंत परवानगी दिली तर मला स्वतःला आवडेल. मी स्वतः दांडिया खेळायला जाते. पण सरकारने कायदा व सुव्यवस्था पाहून निर्णय घ्यावा.

या स्वच्छता मोहिमेची पोस्टही अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्वीटक अकाउंटला पोस्ट केली होती. स्वच्छतेच्या त्या खऱ्या ब्राँड अम्बॅसिडर ठरल्या.