Uddhav Thackarey : समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करूया; मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पुर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा

नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक एक जण म्हणता म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हिच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे.

Uddhav Thackarey : समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करूया; मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पुर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 7:26 PM

मुंबई : थांबायचं नाही पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देतं. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला केले आहे.

आपल्या संदेशात काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक एक जण म्हणता म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हिच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिध्द व्हायचे आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरीता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.

सायंकाळी 5 ते सकाळी 6 दरम्यान सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

दरम्यान, ओमिक्रॉनची वाढती लोकसंख्या पाहता नववर्षाच्या पार्ट्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सायंकाळी 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चौपाटी, गार्डन आदि मोकळ्या जागेत जमण्यास मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व चौपाट्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray wished the people on New Year’s Eve)

इतर बातम्या

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपुष्टात, मात्र अद्याप झोनल डायरेक्टर या पदावर कायम

New year celebration : वर्षातला शेवटचा सुर्यास्त पाहण्यासाठी गर्दी, सेलिब्रेशनची नियमावली काय? वाचा सविस्तर