AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या 6 तरुणी, दादर स्टेशनची संध्याकाळ; चेहऱ्यावर असंख्य प्रश्न, मुख्यमंत्री कार्यालयातून काय सूत्र हलली?

आमच्यावर बेतलेला प्रसंग टळला, पण इतरही अनेक जणींवर अशी वेळ आली असेल ही भीती कायमचीच संपली तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केल्याचं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलंय.

त्या 6 तरुणी, दादर स्टेशनची संध्याकाळ; चेहऱ्यावर असंख्य प्रश्न, मुख्यमंत्री कार्यालयातून काय सूत्र हलली?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 01, 2023 | 10:41 AM
Share

गिरीश गायकवाड, मुंबईः दादर स्टेशनची (Dadar Station) संध्याकाळ. ७.३० ते ८.०० वाजता. गावखेड्यातून आलेल्या6 जणी. तिकिट काउंटरजवळच जमिनीवर बॅनर टाकून बसलेल्या. अंगाभोवती कुडकुडडाणी थंडी (Cold) अन् चेहऱ्यावर असंख्य प्रश्नांचं मोहोळ.. जवळ जाऊन विचारलं तर त्या पोलीस भरतीसाठी (Police recruitment) आल्याचं कळलं. पण नियोजित ठिकाणी रहाण्याची व्यवस्था फुल्ल झाल्यानं कालची रात्र त्यांनी स्टेशनवरच काढण्याचं ठरवलं.. आजूबाजूने जाणाऱ्या वाईट नजरांचे झेलत स्वतःचं रक्षण करत रात्र काढायची अन् सकाळी ५ वाजता ग्राउंडवर हजर व्हायचं.. या चिंतेने ग्रासलेल्या मुली पाहून एका जागृत तरुणीनेच पुढाकार घेतला अन् थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत हा पेच मांडला. एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमधून तत्काळ सूत्र हलली अन् या तरुणीच्या सुरक्षित राहण्याची सोय झाली. याच तरुणीने सोशल मीडियावर मांडलेला हा प्रसंग सध्या मुंबईत अन् राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.

इतरांच्या मुलींबाबत हे घडतंय, तोपर्यंत आपल्याला या प्रसंगाचं गांभीर्य कळणार नाही. एकदा तरी या मुलींच्या जागेवर आपल्या मुलींना ठेवून पहा आणि मग बघा, अशा शीर्षकाखाली ही सोशल मीडियातील पोस्ट लिहिण्यात आलीय. अस्मिता पुराणिक या जागृत तरुणीने स्टेशनवर दिसलेल्या सहा मुलींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागितलेल्या मदतीचा हा किस्सा सध्या चर्चेत आहे..

काय घडलं नेमकं?

नाशिक जिल्ह्यातून या ६ मुली मुंबईत नायगाव येथे पोलीस भरतीसाठी आल्या आहेत. मात्र नायगाव येथे भरती प्रक्रियेच्या ठिकाणी अचानक राहण्याची जागा फुल्ल झाल्याचं सांगण्यात आलं. खूप वेळ कुणीच मदत करत नसल्याचं पाहून रात्र काढायची कशी, असा प्रश्न उभा राहिला. त्यातूनच त्यांनी दादर स्टेशन गाठायचं ठरवलं…

गावखेड्यातून आलेल्या या मुलींनी मदत मागूनही न मिळणं ही अत्यंत शरमेची बाब. अशा मुलींबाबत काही बरंवाईट झालं असतं तर त्यासाठी जबाबदार कोण, या विचारातून तरुणीनं मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला.

एकनाथ शिंदे यांचा फोन व्यग्र असल्याने वर्षा बंगल्यावर फोन केला. एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे यांनी ही समस्या ऐकून घेतली. तत्काळ स्टेशन मास्तर अमित खरे, डेप्युटी स्टेशन मास्तर पांडेय यांच्याशी फोनवर संवाद साधला अन् सहा मुलींना रात्री सुखरुप राहण्याची, वेटिंग रुममध्ये राहण्याची व्यवस्था केली.

दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने रात्री पुरेसं जेवण आणि सुरक्षित झोप घेण्याची व्यवस्था करण्यात आली. आमच्यावर बेतलेला प्रसंग टळला, पण इतरही अनेक जणींवर अशी वेळ आली असेल ही भीती कायमचीच संपली तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केल्याचं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलंय.

Follow Us
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?